शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

बदलीसाठी आंतरजिल्हा शिक्षकांचे उपोषण

By admin | Updated: May 30, 2016 23:53 IST

अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांमध्ये बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवरून मतभेद झाले असून दुसरीकडे या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटना आणि पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली. आंतरजिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा आकडा २ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. यातील २०७ शिक्षकांना यापूर्वी शिक्षण विभागाने अटी-शर्तींवर जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. मात्र, साधारण सहा महिन्यानंतही या शिक्षकांना जिल्ह्यात घेतलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या या २०७ शिक्षकांनी कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. सोमवारी शिक्षण विभागाने आंदोलनकर्त्यांना पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आंतरजिल्हा शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यात येईल, असे पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतर शिक्षकांचे उपोषण सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान, दुपारनंतर आंदोलनकर्त्या शिक्षकांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली. २०७ ना हरकत मिळालेल्या शिक्षकांना आधी त्यांची बदली व्हावी, असे वाटत आहे. तर उर्वरित शिक्षकांना पदोन्नती झाल्यावर रिक्त होणाऱ्या २०० ते २५० जागा आणि आधीच्या २०७ जागा अशा ४५० जागांवर एकदम शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, असे वाटत आहे. यातून आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने बिनवडे यांना उपोषण मागे घेत असल्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात उपोषण सुरूच राहिले. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना गुरुमाउली मंडळ, सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, ऐक्य मंडळ, पुरोगामी मंडळ, इब्टा मंडळ, पदवीधर शिक्षक महामंडळ यांनी पाठिंबा दिला. तसेच जि. प. सदस्य संभाजी दहातोंडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)