शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

देशाच्या प्रगतीसाठी आंतरशाखीय संशोधन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST

संगमनेर : आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनावर भर दिल्यास संशोधन हे समाजाभिमुख होऊन त्याचा उपयोग सर्व ...

संगमनेर : आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनावर भर दिल्यास संशोधन हे समाजाभिमुख होऊन त्याचा उपयोग सर्व क्षेत्रांच्या जडणघडणीमध्ये होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठातील रिसर्च फाऊंडेशन पार्कचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.

संगमनेर महाविद्यालय, विज्ञान मंडळ आयोजित ऑनलाईन विज्ञान दिनानिमित्त व विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी शाळीग्राम बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, प्रा. प्रवीण त्र्यबंके, सहसमन्वयक डॉ. अशोक तांबे आदी उपस्थित होते.

डॉ. शाळीग्राम म्हणाले, संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ते कसे पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एक परिपूर्ण संशोधन हे भारतातील समाजाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी सर्वप्रथम उपस्थितांना विज्ञान दिनाच्या सुभेच्छा दिल्या. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रास्ताविक प्रा. प्रवीण त्र्यंबके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंका डुबे यांनी केले. डॉ. अशोक तांबे यांनी आभार मानले.