शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पतसंस्थांच्या ठेवींनाही आता विमा संरक्षण : साडेआठ हजार पतसंस्थांत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:39 IST

महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था, तसेच मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रूपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

अहमदनगर : महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था, तसेच मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रूपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. राज्यातील सुमारे साडेआठ हजार पतसंस्थांच्या अंदाजे ४० हजार कोटी रूपयांच्या ठेवी असलेल्या १ कोटी ठेवीदारांना हे संरक्षण मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था संरक्षण योजना’ असे या योजनेचे नाव असून २५ सप्टेंबर रोजी लोणावळा येथे या योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेत प्राथमिक पातळीवर अ व ब वर्गातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे राज्यातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट होणार आहे. या विमा योजनेच्या हप्त्याचा बोजा ठेवीदारांवर नसून तो पतसंस्था भरणार आहे. महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ व राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरू होत आहे. राज्यातील एकूण १३ हजार ३९० पैकी ८ हजार ४२१ पतसंस्थांमधील ठेवींना या योजनेचा लाभ होणार आहे, अशी माहिती पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.योजनेची संकल्पना नगरचीअहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून नगर जिल्ह्यात ही योजना कार्यरत आहे. आता या योजनाचा स्वीकार राज्य शासनाने केल्याने नगरचा लौकिक वाढला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरल्याची माहिती र्स्थर्यनिधी संघाचे संचालक शिवाजीअप्पा कपाळे, विठ्ठलराव चासकर, विठ्ठलराव अभंग, सुशिला नवले, रविकाका बोरावके, ज्ञानदेव पाचपुते यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर