शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

जलजीवनच्या कामांची खातेप्रमुखांकडून तपासणी, नगर जिल्ह्यात ९०० गावांत कामे प्रगतिपथावर

By चंद्रकांत शेळके | Updated: June 26, 2023 20:28 IST

अधिकाऱ्यांसोबत एक उपअभियंता

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत तक्रारी झाल्याने या कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची नेमणूक करण्यात आली. दोन दिवस तपासणी केल्यानंतर सोमवारी या खातेप्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे अहवाल सादर केला.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील अनेक गावांत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाकडून ८५० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनांची कामे ९०० गावांमध्ये केली जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू असली तरी यातील बहुतांश कामे गेल्या वर्षभरात मंजुरी मिळून सुरू झालेली आहेत. सध्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कामे सुरू आहेत. परंतु या कामांबाबत अनेक तक्रारी सध्या जिल्हा परिषदेकडे येत आहेत. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसह सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या या तक्रारी आहेत. दरम्यान, मध्यंतरी अशाच तक्रारीमुळे राज्य सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या संचालनालयाने या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.

दरम्यान, कामांच्या निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष कामात काही त्रुटी राहू नयेत किंवा गावांतील लोकांची योजनेबद्दलची मते जाणून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचे सीईओंचे मत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील काही कामांना भेटी देऊन तेथील तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची नेमणूक करण्याचा निर्णय सीईओ येरेकर यांनी घेतला. त्यानुसार या विभागप्रमुखांनी शनिवार (दि. २४) व रविवार (दि. २५) असे दोन दिवस कामांची पाहणी केली. त्याचा अहवाल दि. २६ रोजी येरेकर यांना विभागप्रमुखांनी सादर केला. आता या अहवालात नेमके काय आढळले, हे गुलदस्त्यात आहे. कामांचा दर्जा खरंच निकृष्ट आहे की केवळ राजकीय श्रेयवादातून या तक्रारी झाल्या आहेत, या बाबी आता अहवालातूनच समोर येणार आहेत.अधिकाऱ्यांसोबत एक उपअभियंताजिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी जिल्हा परिषदेचे १४ विभागप्रमुख विविध तालुक्यांत या कामांची तपासणी करण्यासाठी गेले. बांधकामासह पाईप व इतर साहित्याच्या दर्जा, पाणी योजनेचे स्त्रोत ही पाहणी करण्यासह गावातील लोकांची मते अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. दरम्यान, यातील काही बाबी तांत्रिक असल्याने त्याबाबतची माहिती देण्यासाठी या अधिकाऱ्यांसोबत पाणीपुरवठा विभागातील एकेका उपअभियंत्याची नेमणूक करण्यात आली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर