शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

अंतरंगातून काव्यनिर्मिती

By admin | Updated: September 1, 2014 00:00 IST

अहमदनगर : समाजवास्तवाचे चिंतन केल्यानंतर अंतरंगातूनच काव्यनिर्मिती होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले़

अहमदनगर : लेखकाला स्वत:सह दुसऱ्याचीही लढाई लढावी लागते़ संघर्ष पहावा आणि अनुभवावा लागतो़ समाजवास्तवाचे चिंतन केल्यानंतर अंतरंगातूनच काव्यनिर्मिती होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले़नगर येथे आयोजित कवयित्री संजीवनी खोजे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भोंजाळ, अरविंद्र ब्राम्हणे, चंद्रकांत पालवे आदी उपस्थित होते़ यावर्षीचा कवयित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार औरंगाबाद येथील कवी अभय दाणी यांच्या ‘ऐरवी हा जाळ’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला़ सासणे पुढे म्हणाले की, मनाच्या गूढ अंतरंगात कवितेचा जन्म होतो़ शब्दांच्या शोधात कधीच कविता होत नाही़ आशयानंतर शब्द येतात़ कवितेची अनेक रुपे असतात़ कविंनी पद्यासह गद्यातही कविता लिहावी असे ते म्हणाले़ कवी अभय दाणी म्हणाले की, दिवसेंदिवस साहित्यात मोठी दरी निर्माण होत आहे़ वाङमयीन संस्थांनी ही दरी भरून काढावी़ जगण्यातील संघर्ष अनुभवत असताना कवितेची निर्मिती होते़ कविता समजून घ्यावयाची असेल तर जीवनाचा वेग कमी करून समाज समजून घ्यावा लागतो असे ते म्हणाले़ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भोंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले़ दरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोहिणी उदास यांना देण्यात आले़ बानू शेख यांना द्वितीय तर अनिल देशपांडे, गणेश कवटे व नागेश शेलार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले़ केशव भणगे यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत मुथा, दिनेश रोडे, साहित्यिक संजय कळमकर, अमोल बागूल, चं़वि़ जोशी,भास्करराव डिक्कर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ अरविंद ब्राह्मणे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)