शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नेप्ती उपबाजारात बेमुदत कांदा लिलाव बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST

केडगाव : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई ...

केडगाव : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवार (दि.४) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले. शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी कांदा लिलाव होतात. नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह आष्टी, शिरूर या भागातील शेतकरी ही मोठ्या प्रमाणात कांदा आणतात. गुरुवारी सुमारे ४५ हजार गोणी कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. सकाळी १० वाजता लिलावाला सुरुवात होणे आवश्यक होते. पण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि व्यापारी यांच्यात वाराईच्या मुद्यावरून वाद झाल्याने ट्रान्सपोर्ट असोसिएशनने कांदा नेला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले नाही. या दोघांच्या वादात लिलाव सुरू न झाल्याने दुपारनंतर शेतकरी संतप्त झाले. त्यांनी समोरच्या बाह्य वळण रस्त्यावर आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सहभाग घेतला. त्यानंतर बाजार समितीचे गेट बंद करण्याचा प्रयत्न झाला. बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सचिव अभय भिसे यांसह सर्व पदाधिकारी यांनी व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्यात मध्यस्थी केल्याने वाद मिटला व दुपारी साडे ३ नंतर गुरुवारसाठीचे लिलाव पूर्ण करण्यात आले. परंतु पुढील लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

......................

शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. शेतकऱ्यांनी लिलाव चालू करावे, यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. मी आल्यावर रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा गेटवर आंदोलन करू, असे सांगितले. हे समजल्यावर मिटिंग अर्धवट सोडून संचालक गेटवर आले. व्यापारी व ट्रान्सपोर्ट याचा विषय मिटला असून लिलाव सुरळीत चालू झाले, असे त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना सांगितले.

-संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य

..................

कांदा व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना याची वाराई या विषयाचा वाद झाला. याबाबत दोघांनी ताठर भूमिका घेतली. याबाबत या दोघांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढला व कांदा लिलाव सुरळीत चालू केले. बाजार समितीने आत्तापर्यंत शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.

-अभिलाष घिगे, सभापती

..........

वाहतूक संघटनेने अचानक ज्याचा माल त्याचा हमाल अशी मागणी केली. राज्यात कोणीच हा निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांचा माल नाशवंत असतो. त्याची त्वरित वाहतूक करणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूक संघटनेने वाहन उपलब्ध न करण्याचे धोरण घेतले.

-नंदकुमार शिकरे, अध्यक्ष, व्यापारी संघटना