शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाठ वाढविलेली पाणीपट्टी कमी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ...

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कमालीचा अडचणीत असताना अशा पद्धतीची दरवाढ योग्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०१८ प्रमाणेच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी देताना अडीच किलोमीटरची मर्यादा असल्याने मिळणाऱ्या पाण्यापासून बरेच शेतकरी वंचित राहतात. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नाशिक, नगर ते हक्काचे पाणी औरंगाबादला गेले. परंतु, यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रासह कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सध्याची पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत केलेली वाढ खूप अन्यायकारक आहे. अतिवृष्टी व खरीप पिकांच्या नुकसानीने शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. मार्च २०२०पासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, मका, भाजीपाला़ डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांची खरेदी व्यवस्था कोलमडल्याने पिकासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या पिकावर नांगर फिरवावा लागला. अजूनही कोरोनामुळे परिस्थिती सुधारलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे, असेही औताडे यांनी म्हटले आहे.