शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाठ वाढविलेली पाणीपट्टी कमी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ...

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कमालीचा अडचणीत असताना अशा पद्धतीची दरवाढ योग्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०१८ प्रमाणेच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी देताना अडीच किलोमीटरची मर्यादा असल्याने मिळणाऱ्या पाण्यापासून बरेच शेतकरी वंचित राहतात. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नाशिक, नगर ते हक्काचे पाणी औरंगाबादला गेले. परंतु, यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रासह कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सध्याची पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत केलेली वाढ खूप अन्यायकारक आहे. अतिवृष्टी व खरीप पिकांच्या नुकसानीने शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. मार्च २०२०पासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, मका, भाजीपाला़ डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांची खरेदी व्यवस्था कोलमडल्याने पिकासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या पिकावर नांगर फिरवावा लागला. अजूनही कोरोनामुळे परिस्थिती सुधारलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे, असेही औताडे यांनी म्हटले आहे.