शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

भरमसाठ वाढविलेली पाणीपट्टी कमी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ...

कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कमालीचा अडचणीत असताना अशा पद्धतीची दरवाढ योग्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०१८ प्रमाणेच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी देताना अडीच किलोमीटरची मर्यादा असल्याने मिळणाऱ्या पाण्यापासून बरेच शेतकरी वंचित राहतात. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नाशिक, नगर ते हक्काचे पाणी औरंगाबादला गेले. परंतु, यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रासह कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सध्याची पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत केलेली वाढ खूप अन्यायकारक आहे. अतिवृष्टी व खरीप पिकांच्या नुकसानीने शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. मार्च २०२०पासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, मका, भाजीपाला़ डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांची खरेदी व्यवस्था कोलमडल्याने पिकासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या पिकावर नांगर फिरवावा लागला. अजूनही कोरोनामुळे परिस्थिती सुधारलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे, असेही औताडे यांनी म्हटले आहे.