शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वर्षापासून वाढतोय मानसिक ताण; जगायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात आहेत. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळत नाही. अनेकांच्या नोकऱ्या तसेच रोजगार गेल्याने आर्थिक विवंचनेतून मानसिक तणाव वाढला आहे. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

गतवर्षी सुरुवातीलाच देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून देशाचे चाक थांबले होते. त्यानंतर हे लॉकडाऊन जसजसे वाढत गेले तसतसे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडत गेले. यात अनेकांचे व्यवसाय गेले, नोकऱ्या गेल्या, शेती व्यवसाय कोलमडले, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे काम गेले. गेल्या वर्षातून सावरत असतानाच पुन्हा यावर्षी ३ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा तेच झटके, चटके बसू लागले. या महामारीचा तसा सर्व वयोगटातील महिला - पुरुषांवर परिणाम झाला आहे. याच अडचणीच्या काळात कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या लाखो रुपयांचे नियोजन करतानाही नाकीनऊ येत आहेत. त्यातून अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ येत आहे.

................

आर्थिक अडचणीमुळे नैराश्य...

मानसिक ताणाची सर्वाधिक संख्या ही तरुणाईची आहे. कारण ऐन उमेदीच्या काळातील भविष्यातील नियोजनाचे दोन वर्ष हातून निसटून चालले आहे. मनासारखे काहीच करता येत नाही. हातची नोकरी गेली, व्यवसाय सुरु केला तर या महामारीत प्रतिसाद मिळत नाही. शेतीत लाखो रुपये खर्च करून, काबाडकष्ट करून उत्पादित शेतमालाला भाव मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून भासणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा? प्रसंगी यातून नैराश्यदेखील येत आहे.

...............

नोकरी गेली, आता काय करू

कोरोनाचा थेट अर्थकारणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. यात अनेकांना आपल्या हक्काच्या नोकरीला मुकावे लागले. दुसरी नोकरी मागूनही मिळत नाही. त्यामुळे नोकरी गेली, आता काय करू? स्वतःसह कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण कराव्या, अशा विवंचनेने अनेकांना ग्रासले आहे.

...........

कोरोना महामारीचा सुरळीत चाललेल्या जनजीवनावर, अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. यातून अनेकांना अनपेक्षित धक्के बसले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. अशी गेल्या वर्षापासून अनेक रुग्णांची तपासणी केली. मात्र, सद्यस्थितीत कोरोना या संकटाला कोणी जा म्हटल्याने जाणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर जगायचे आहे. त्यासाठी त्याच्याशी व त्याच्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व मानसिक परिस्थितीला तोंड देत मात करायची आहे. त्याकरिता खचून न जाता मनस्थिती स्थिर ठेवून, गरजा कमी करून सकारात्मक विचार करून लढावे लागणार आहे. तसेच कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यातून निश्चित मानसिक तणाव कमी होईल.

- डॉ. सुनील उंडे, मानसोपचार तज्ज्ञ, श्रीरामपूर