शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
2
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
3
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
4
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
5
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
6
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
7
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
8
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
9
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
10
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
11
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
12
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
13
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
14
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
15
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
16
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
17
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
18
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
19
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
20
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव

वर्षापासून वाढतोय मानसिक ताण; जगायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात आहेत. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळत नाही. अनेकांच्या नोकऱ्या तसेच रोजगार गेल्याने आर्थिक विवंचनेतून मानसिक तणाव वाढला आहे. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

गतवर्षी सुरुवातीलाच देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून देशाचे चाक थांबले होते. त्यानंतर हे लॉकडाऊन जसजसे वाढत गेले तसतसे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडत गेले. यात अनेकांचे व्यवसाय गेले, नोकऱ्या गेल्या, शेती व्यवसाय कोलमडले, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे काम गेले. गेल्या वर्षातून सावरत असतानाच पुन्हा यावर्षी ३ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा तेच झटके, चटके बसू लागले. या महामारीचा तसा सर्व वयोगटातील महिला - पुरुषांवर परिणाम झाला आहे. याच अडचणीच्या काळात कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या लाखो रुपयांचे नियोजन करतानाही नाकीनऊ येत आहेत. त्यातून अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ येत आहे.

................

आर्थिक अडचणीमुळे नैराश्य...

मानसिक ताणाची सर्वाधिक संख्या ही तरुणाईची आहे. कारण ऐन उमेदीच्या काळातील भविष्यातील नियोजनाचे दोन वर्ष हातून निसटून चालले आहे. मनासारखे काहीच करता येत नाही. हातची नोकरी गेली, व्यवसाय सुरु केला तर या महामारीत प्रतिसाद मिळत नाही. शेतीत लाखो रुपये खर्च करून, काबाडकष्ट करून उत्पादित शेतमालाला भाव मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून भासणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा? प्रसंगी यातून नैराश्यदेखील येत आहे.

...............

नोकरी गेली, आता काय करू

कोरोनाचा थेट अर्थकारणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. यात अनेकांना आपल्या हक्काच्या नोकरीला मुकावे लागले. दुसरी नोकरी मागूनही मिळत नाही. त्यामुळे नोकरी गेली, आता काय करू? स्वतःसह कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण कराव्या, अशा विवंचनेने अनेकांना ग्रासले आहे.

...........

कोरोना महामारीचा सुरळीत चाललेल्या जनजीवनावर, अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. यातून अनेकांना अनपेक्षित धक्के बसले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. अशी गेल्या वर्षापासून अनेक रुग्णांची तपासणी केली. मात्र, सद्यस्थितीत कोरोना या संकटाला कोणी जा म्हटल्याने जाणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर जगायचे आहे. त्यासाठी त्याच्याशी व त्याच्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व मानसिक परिस्थितीला तोंड देत मात करायची आहे. त्याकरिता खचून न जाता मनस्थिती स्थिर ठेवून, गरजा कमी करून सकारात्मक विचार करून लढावे लागणार आहे. तसेच कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यातून निश्चित मानसिक तणाव कमी होईल.

- डॉ. सुनील उंडे, मानसोपचार तज्ज्ञ, श्रीरामपूर