सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी (दि. ११) २०१९-२०२० या गळीत हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव यादव, संभाजी वाकचौरे, दादासाहेब कुटे, सुरेश झावरे, भास्करराव आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, दूध आणि ऊस हे शाश्वत उत्पादन आहे. मात्र, शेतकऱ्यांनी त्याकडे व्यावसायिकतेतून पाहणे गरजेचे आहे. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना होईल. कार्यक्षेत्रात जास्त उत्पादन झाल्याने बाहेरील ऊस आणताना त्या वाहतुकीचा खर्च कमी होऊन उसाची रिकव्हरीही वाढेल.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष हासे यांनी आभार मानले. अण्णा राहिंज, सीताराम वर्पे, केशव दिघे, किरण कानवडे, ॲड. शरद गुंजाळ, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.
....
या शेतकऱ्यांचा सन्मान
रवींद्र भोकनळ (निमज), रोहिदास पवार (राजापूर), भास्कर गोपाळे (सुलतानपूर), मुरलीधर वर्पे (कनोली), लक्ष्मण गुंजाळ (खांडगाव), त्र्यंबक देशमुख (मंगळापूर), भाऊसाहेब येवले (मेहेंदुरी), जिजाभाऊ शिंदे (ओझर खु), शिवाजी वर्पे (संगमनेर खुर्द), दगडू बंगाळ (मेहेंदुरी), सुधाकर नवले (औरंगपूर), भास्कर आरोटे (मेहेंदुरी) या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.