शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रधानमंत्री सिंचन योजनेत निळवंडेचा समावेश करा

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

शिर्डी : उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळपट्टयाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेत करावा

शिर्डी : उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळपट्टयाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेत करावा आणि निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारने वित्त विभागाची तातडीने सहमती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.या संदर्भात विखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाची सद्यपरिस्थिती निदर्शनास आणून दिली. निळवंडे धरण्याच्या भिंतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उजव्या कालव्याचे काम ११ टक्के आणि डाव्या कालव्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले असेल तरी दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ८५० कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्य सरकारने अर्थ संकल्पात १० कोटी रुपये व कालव्यांसाठी फक्त ३ कोटी रुपये इतकी अत्यल्प केलेली तरतूद पुरेशी नाही, याकडे विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधले.वास्तविक कालव्याची कामे पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाच्या ए. आय. बी. पी. योजनेंतर्गत निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय जल आयोगाची सन २०१४ मध्ये मान्यता घेण्यात आलेली आहे. जलआयोगाची मान्यता घेऊन प्रकल्प केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर प्रस्तावित करण्यासाठी केंद्रीय संचनालयाच्या सतरा प्रकारच्या मान्यता घेण्यासाठी आपण व्यक्तिश: पाठपुरावा करून प्रयत्न केला. राज्य सरकारच्या वित्त विभागाची संमती प्राप्त न झाल्यामुळे निळवंडे प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीसमोर सादर होऊ शकलेला नाही. त्यामुळेच निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारने वित्त विभागाची संमती तातडीने द्यावी, अशी मागणी विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (तालुका प्रतिनिधी)