शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

चाचणीपैकी बाधित होण्याचे प्रमाण ३६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्ह्यात रोज सरासरी ५ ते ६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यातून दिवसाला २,२०० जणांचा कोरोना चाचणी ...

अहमदनगर : जिल्ह्यात रोज सरासरी ५ ते ६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यातून दिवसाला २,२०० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह येण्याचा दर हा ३६ टक्क्यांवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी बाधित होण्याचे प्रमाण १८ टक्के होते. ते आता दुप्पट झाले आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे शासकीय आकडेवारीनुसार १.१४ इतके दाखवले जात असले तरी सध्या होणाऱ्या मृत्यूचा आकडा पाहिला तर हे प्रमाणही १.३८ टक्क्यांपर्यंत गेल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी झालेला दिसत नाही. रोज सरासरी २ हजार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तर चाचणी झालेल्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचा दर ३६ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे चिंताही वाढली आहे.

-------------

असा वाढले प्रमाण

महिना बाधित रुग्ण बाधित प्रमाण मृत्यू मृत्यूचे प्रमाण

एप्रिल २०२०

जून-२०२०

ऑगस्ट २०२०

ऑक्टोबर २०२०

डिसेंबर २०२०

फेब्रुवारी २०२१

एप्रिल २०२१

---------------

आकडेवारीमध्ये तफावत

सध्या अमरधाममध्ये रोज ४० ते ४५ जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. असे असताना शासकीय पोर्टलवर मृत्यूचा आकडा हा अत्यंत कमी दाखवला जात आहे. ज्या दिवशी ३२ मृत्यू झाले, त्या दिवशी शासकीय पोर्टलवर १३ जणांचा मृत्यू दाखवला होता. दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या ४५ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्या दिवशी शासकीय आकडेवारीत फक्त ३ जणांचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळे मृत्यूच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा मात्र बोलायला तयार नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी शनिवारी संपर्क साधला असला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

------------------

एकूण आकडेवारीशी तुलना केल्याने गांभीर्य कमी

बाधित रुग्णांचे प्रमाण काढताना आरोग्य यंत्रणेकडून आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी आतापर्यंत झालेल्या बाधितांची संख्या किती आहेत, अशा पद्धतीने प्रमाण काढले जाते. त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण कमी दिसते. ९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत झालेल्या चाचण्या ५ लाख २३ हजार ९०५ इतक्या आहेत. त्यापैकी १ लाख ११ हजार ४२३ इतके पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बाधिताचे हे प्रमाण २१. २७ टक्के इतके दिसते आहेत. सध्या रोज ५ ते ६ हजार चाचण्या होत असून, त्यापैकी सरासरी २,२०० जण पॉझिटिव्ह येत आहेत. दिवसाचे हे प्रमाण ३६ टक्के आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोरोनाची गांभीर्य लक्षात येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

--------------