शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:33 IST

पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले़. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.

अहमदनगर : परतीच्या पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला असून, अतिपावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे़ तर काही ठिकाणी बंधारे वाहून गेले आहेत़ मुळा व गोदावरीला पूर आला आहे़संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या तळेगाव दिघे परिसरात परतीच्या पावसाचे जोरदारपणे आगमन झाले. पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गावक-यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच सहा वर्षांपासून असा जोरदार पाऊसच झाला नव्हता. पावसामुळे संपूर्ण तळेगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे. कारण आतापर्यंत विहिरी, नाले, तळे पावसाळा संपत आला तरी कोरडी ठाकच होती. आता सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे तळेगाव परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.

अति पावसामुळे कांदा, भुईमुगाचे नुकसान

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या सलग पावसामुळे ऐन काढणीस सुरूवात झालेल्या लाल सेंद्रीय कांदा व भुईमूग या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत. पठार भागात खरीप हंगामात बाजरी, कांदा, भुईमूग ही पिके प्रमुख आहेत. यावर्षीही सुरूवातीच्या दमदार पावसांमुळे या पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली. वेळोवेळी झालेल्या पावसाने या पिकांची वाढ जोमाने झाली. बाजरी कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजरीच्या मळणीची कामे पूर्ण झाली. सततच्या ऊन-पावसाच्या तापमान बदलांमुळे नांदूर खंदरमाळ, सारोळेपठार व लगतच्या गावांमधील जवळपास पंधराशे हेक्टर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

शेतक-यांपुढे संकट

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व पोहेगाव परिसरातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पोहेगाव परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. २-३ दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण डाळींब व इतर पिकांना पोषक नाही. परतीच्या पावसाचा मोठा फटका बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके आडवी होऊन सडू लागली आहेत. आधीच शेतीमालाला भाव नाही. त्यात परतीच्या पावसाने हातचे पिक नासविल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे.