शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:33 IST

पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले़. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.

अहमदनगर : परतीच्या पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला असून, अतिपावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे़ तर काही ठिकाणी बंधारे वाहून गेले आहेत़ मुळा व गोदावरीला पूर आला आहे़संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या तळेगाव दिघे परिसरात परतीच्या पावसाचे जोरदारपणे आगमन झाले. पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. गावक-यांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच सहा वर्षांपासून असा जोरदार पाऊसच झाला नव्हता. पावसामुळे संपूर्ण तळेगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे. कारण आतापर्यंत विहिरी, नाले, तळे पावसाळा संपत आला तरी कोरडी ठाकच होती. आता सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे तळेगाव परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.

अति पावसामुळे कांदा, भुईमुगाचे नुकसान

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या सलग पावसामुळे ऐन काढणीस सुरूवात झालेल्या लाल सेंद्रीय कांदा व भुईमूग या नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत. पठार भागात खरीप हंगामात बाजरी, कांदा, भुईमूग ही पिके प्रमुख आहेत. यावर्षीही सुरूवातीच्या दमदार पावसांमुळे या पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ झाली. वेळोवेळी झालेल्या पावसाने या पिकांची वाढ जोमाने झाली. बाजरी कापणीच्या वेळी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाजरीच्या मळणीची कामे पूर्ण झाली. सततच्या ऊन-पावसाच्या तापमान बदलांमुळे नांदूर खंदरमाळ, सारोळेपठार व लगतच्या गावांमधील जवळपास पंधराशे हेक्टर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

शेतक-यांपुढे संकट

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व पोहेगाव परिसरातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पोहेगाव परिसरात परतीचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. २-३ दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण डाळींब व इतर पिकांना पोषक नाही. परतीच्या पावसाचा मोठा फटका बाजरी, सोयाबीन, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके आडवी होऊन सडू लागली आहेत. आधीच शेतीमालाला भाव नाही. त्यात परतीच्या पावसाने हातचे पिक नासविल्याने शेतकºयांपुढे संकट उभे राहिले आहे.