शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रीयतेमुळे जनतेचे दिवाळे निघाले-उदयनराजे भोसले; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ राशीनला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 15:36 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा आरोप माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

कर्जत : काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा आरोप माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत तालुक्यातील राशीन येथे उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी खा.सुजय विखे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उदयनराजे पुढे म्हणाले, भाजपचे नेते, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरेचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते. त्यांचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ध्येय होते. त्यानंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने हे काम १५ वर्षे बंद पाडले. केवळ घोषणाच त्यांनी केल्या. कृष्णा खोरेचा प्रकल्प बंद पाडला. पैसा मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. हा पैसा कुठे गेला? असा प्रश्न त्यांनाच विचारा. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी कधी जनतेचा विचार केला नाही. दुष्काळी भागाला पाणी देता येईल का? बेरोजगारांना रोजगार देता येईल का? याचा विचार त्यांनी केला नाही. यामुळे राष्ट्रवादीवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. राम शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले. त्यांनी प्रत्येक वेळी समाजाचे हीत जोपासले. फक्त जनतेच्याच प्रश्नाचा विचार केला. त्यामुळे याही वेळी त्यांनाच बळ द्या, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.राम शिंदे म्हणाले, मतदार संघातील महिलांना बचत गटामार्फत काम दिले जाईल. फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारणार. दुष्काळी भागाला कुकडीचे पाणी देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. अजून काही भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणार आहे. सध्या पैशाच्या जोरावर निवडणूक सुरू आहे. आमच्या गरिबीची चेष्टा करु नका. हा मतदार विकासाला मत देणारा आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019