शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नवीन शिक्षण धोरणात महाविकास आघाडी सरकारकडून खोडा, चंद्रकांत पाटीलांचा टीकेचा बाण

By चंद्रकांत शेळके | Updated: September 6, 2022 17:11 IST

आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.

अहमदनगर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरणाची देशभर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र मागील अडीच वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राशी असहकार पुकारून त्याची अंमलबजावणी केली नाही. आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू," असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

अहमदनगरजवळ असलेल्या बाबुर्डी घुमट येथे मंगळवारी (दि. ६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंत्री पाटील व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे शिक्षण मिळणार आहे. ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती स्वत:च्या स्वार्थासाठी भारतीयांवर लादली, त्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी नवीन शिक्षण पद्धती उपयोगी ठरेल. भारतीय संशोधन अतिशय प्रगत आहे. कोरोना काळात जगाला त्याची प्रचिती आली.

भारताने बनवलेल्या कोरोनाच्या लसीने केवळ भारतातील १३७ कोटी लोकांचेच नाही, तर जगभरातील ६० देशांतील लोकांचे प्राण वाचवले. कधी काळी ज्या अमेरिकेतून भारताला लाल गहू आयात करून माणसे जगवावी लागली, आज तोच भारत देश जगाला कोरोनाची लस पुरवतोय, है गौरवास्पद असल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी