शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

प्रस्तावित वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा; वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By चंद्रकांत शेळके | Updated: January 30, 2024 21:03 IST

वकिलांवरील हल्ल्यांमुळे चिंता

चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील आठवड्यात राहुरी येथे वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दुपारी शहर वकील संघटनेच्या वतीने कामकाज बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला.

एक वकील लाख वकील, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी वकिलांनी दिल्या. या मोर्चास शहरातील सेंट्रल बार, कौटुंबिक न्यायालय वकील असोसिएशन, धर्मादाय आयुक्त न्यायालय बार असोसिएशनसह भाजपा वकील आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. संघटनांचे शेकडो वकील या पायी मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना वकील संघटनेचे सचिव ॲड. संदीप शेळके व उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बार कौन्सिल महाराष्ट्र ॲण्ड गोवा यांच्या वतीने राज्य शासनाकडे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलचा मसुदा सहा महिन्यांपूर्वीच सादर केलेला आहे. परंतु हे बिल महाराष्ट्रात लागू करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही, त्यातच राहुरी तालुक्यातील विधिज्ञ राजाराम आढाव व विधिज्ञ मनीषा आढाव यांचा २५ जानेवारीला खून करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर वकील वर्गात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने करावा.

मोर्चात शहर वकील संघटनेचे सचिव संदीप शेळके, उपाध्यक्ष महेश शेडाळे, महिला सहसचिव भक्ती शिरसाठ, खजिनदार शिवाजी शिरसाठ, सहसचिव संजय सुंबे, कार्यकारिणी सदस्य अमोल अकोलकर, सारस क्षेत्रे, विनोद रणसिंग, देवदत्त शहाणे, शिवाजी शिंदे, रामेश्वर कराळे, अस्मिता उदावंत आदींसह शेकडो वकील उपस्थित होते.३ फेब्रुवारीपर्यंत वकिलांची धरणे

वकिलांसाठी संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी वकील संघटनेच्या वतीने ३ फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत. वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.