शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

शेतीसह व्यावसायिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गावातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संबंधित भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवेदनाद्वारे सोमवारी केली.

भाजपाचे माजी आमदार कर्डिले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदनात म्हटले आहे की, सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी जेऊर बाईजाबाई मधील दुकानात घुसले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच कोरोनाच्या काळात व्यावसायिक मोठ्या अडचणीत असताना नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून अर्थसहाय्य करावे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभे पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. शेतातील नुकसानीचे पंचनामे करून शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी. पुराच्या पाण्यामुळे धनगरवाडी, चापेवाडी, ससेवाडी, तोडमलवाडी, शेटे वस्ती या ठिकाणचा संपर्क तुटला. धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

.....