शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अवैध वाळू उपसा : नाशिक-पुणे महामार्गावरील पुलांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:29 IST

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच प्रवरा नदीकाठी असलेले ऐतिहासिक घाटही या वाळू उपशाने खचले आहेत.संगमनेर तालुक्यातून रात्रंदिवस सुरू असलेल्या या अवैध वाळू उपशाकडे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. नाशिक-पुणे या दोन बड्या महानगरांना जोडणा-या प्रवरानदीवरील पुलाची निर्मिती ब्रिटीशांनी केली होती. या पुलास समांतर असा पुल चार वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यानंतर नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्यावरही प्रवरानदीवर पुलाची बांधणी करण्यात आली.या तिन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. प्रवरानदी पात्रातील वाळूला मोठी मागणी आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वाळूमुळे वाळू माफिया मालामाल झाले असून त्यांनी प्रवरानदीपात्र ओरबाडण्याचे काम सुरू केले आहे. हे वाळू माफिया निर्सगाबरोबरच लोकांच्या जीवाशीही खेळत आहेत. ब्रिटीशकालीन पुल, त्यास समांतर पुल व बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखालून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली गेल्याने पुलाचा पाया पुर्णपणे उघडा पडला आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातून वाहणाºया प्रवरानदी तिरावर अनेक ऐतिहासिक घाट आहेत. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने हे खड्डे होवून घाटही खचले आहेत. याकडे मात्र, महसूल विभाग ‘अर्थपूर्ण’पणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे. दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या या तिन्ही पुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता होते आहे.पुराव्यासह तक्रार करणारजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेरात येवून अवैध वाळू उपशामुळे प्रवरा, म्हाळूंगी व मुळा नदीपात्राची झालेली दुरावस्था पाहावी. तालुक्यात वाळूचा एकही लिलाव झाला नसून नदीपात्रातून मात्र, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू माफियांशी लागेबांधे असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करणार आहे. - अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर