शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल द्यायचा असेल तर द्या, नाही तर माघारी घेऊन जा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST

शेवगाव : आदल्या दिवशी, भल्या पहाटे तोडून, निवडून ठेवलेला भाजीपाला, फळभाज्या भल्या सकाळी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून सध्या ...

शेवगाव : आदल्या दिवशी, भल्या पहाटे तोडून, निवडून ठेवलेला भाजीपाला, फळभाज्या भल्या सकाळी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून सध्या अडवणूक सुरू आहे. कष्टाने फुलविलेला शेतमाल कवडीमोल भावात शेतकऱ्यांना विक्री करावा लागतो आहे. थोडा दर वाढवून मागितल्यास ‘माल द्यायचा असेल तर द्या, नाही तर घरी घेऊन जा’ असे उत्तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. घरी नेऊन मालाचे करायचे तरी काय या भावनेतून, परिस्थिती समोर हतबल झालेले शेतकरी मिळेल ती रक्कम पदरात पाडून घेत निराश मुद्रेने घरी परतत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मेपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शेवगाव बाजार समिती बंद आहे. एरवी गजबजलेल्या आवारात शुकशुकाट आहे. दरम्यान, आठवडे बाजार, बाजार समिती बंद असल्याने शेतमाल कुठे अन् कसा विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मशागतीची कामे सुरू असल्याने दारोदार जाऊन माल विकणे शक्य नाही. या संधीचा फायदा घेऊन किरकोळ व्यापाऱ्यांनी कवडीमोल किमतीत माल खरेदी करून चढ्या भावाने गल्ली-बोळात दारोदार फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना करताना उत्पादनाचा खर्च, कष्टाचे मोल मिळत नसल्याचे पाहून शेतात भाजीपाला सडलेला बरा, अशी भूमिका घेतली आहे.

--------

लिलाव, आठवडे बाजार बंदमुळे फटका..

बाजार समितीमध्ये होणाऱ्या मालाच्या लिलावातून बोलीमुळे थोडीफार का होईना, मालाच्या दर्जानुसार भाव मिळत होता. त्यामुळे काही अंशी तरी परवडत होते. मात्र आता ते लिलाव व आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मिळेल त्या भावात शेतमाल किरकोळ व्यापाऱ्यांच्या हवाली करावा लागत आहे.

--------

कांद्याने केले वांधे...

उन्हाळी कांदा साठवणूक करण्यासाठी सुविधा नसल्याने ८५ टक्के कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत. लवकर खराब होणारा कांदा बाजार समिती बंद असल्याने फेकून देण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कांद्याने वांधा केल्याचे चित्र आहे.

-------

बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळभाज्यांची आवक होत आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी मालाची कमी दरात मागणी करीत आहेत. भाजीपाल्याला भाव राहिलेला नाही. कोबी, कोथिंबीरला अजिबात भाव मिळत नाही. मिरची व मेथीला थोडाफार भाव मिळतो. मात्र खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने मजूर लावून कोबी काढायला परवडत नाही.

- मच्छींद्र डाके, शेतकरी, शेवगाव

-------

शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. आठवडे बाजार, बाजार समिती बंद असल्याने शेतमालाचे करायचे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कडक निर्बंध लावत बाजार समिती सुरू ठेवल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल.

- प्रशांत भराट, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना