शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

निधी मिळाला तर व्हीजन...नाही तर आमदारांना करावे लागेल भजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:09 IST

अहमदनगर : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरकारने वाढ केली खरी, पण कोरोनामुळे सरकारचीच तिजोरी रिकामी झाली आहे़ पैसे नसल्याने सरकारने आमदारांच्या निधीला तुर्तास तरी कात्री लावली आहे़ त्यामुळे मतदारसंघातील ‘व्हिजन-२०२०’ पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे़ निधी मिळाला तरच आमदारांचे व्हीजन साकार होणार आहे. निधी मिळाला नाही तर सरकार दरबारी निधीसाठी आमदारांना ‘भजन’ आळवावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत सरकारने वाढ केली खरी, पण कोरोनामुळे सरकारचीच तिजोरी रिकामी झाली आहे़ पैसे नसल्याने सरकारने आमदारांच्या निधीला तुर्तास तरी कात्री लावली आहे़ त्यामुळे मतदारसंघातील ‘व्हिजन-२०२०’ पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे़ निधी मिळाला तरच आमदारांचे व्हीजन साकार होणार आहे. निधी मिळाला नाही तर सरकार दरबारी निधीसाठी आमदारांना ‘भजन’ आळवावे लागणार आहे. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले़ अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अधिवेशानात आमदारांवर निधीची खैरात केली़ त्यांचा स्थानिक विकास निधी २ वरून ३ कोटी केला़ एकदम एक कोटींची बक्षिसी मिळाल्याने आमदारही खूश होते़ जिल्ह्यात विधानसभेचे १२, तर विधानपरिषदेचे २ असे, १४ सदस्य आहेत़ आमदारांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटींची वाढ झाल्याने चालूवर्षी जिल्ह्यात ४२ कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले असते़ परंतु, कोरोनामुळे आता ७ कोटींवर समाधान मानावे लागेल़ यापैकी प्रत्येकी २० लाख, याप्रमाणे २ कोटी ८० लाख नियोजनकडे जमा झाले आहेत़ हा निधीही आरोग्यावर खर्च करावा, अशी अट आहे़ त्यामुळे पहिले वर्षे ‘कोरोना जा’, असे म्हणण्याची वेळ आमदारांवर आली आहे़जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड मतदारसंघात सत्तांतर झाले़ अकोल्यात राष्ट्रवादीने, तर श्रीरामपुरात काँग्रेसने उमेदवार बदलले़ हे दोन्ही नवखे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत़ अशा आठ मतदारसंघातील मतदारांनी बदल घडविला़ मतदारांची अपेक्षा पूर्तीचे हे पहिलेच वर्षे होते़ आजी-माजी आमदारांच्या कामाची तुलना मतदारांना यावर्षात करता आली असती़ पण, सरकारने आमदारांचा निधी गोठविला़  त्यामुळे मतदारसंघातील जनतेला निवडणूक काळात दिलेली अश्वासने पूर्ण करताना सर्वच आमदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ मंत्र्यांकडे जे पाठपुरवा करतील, त्यांना वेगवेगळया योजनांतून निधी मिळेल़ पण, त्यासाठी आमदारांना आपले वजन वापरावे लागेल़ त्यात सहा आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत़ त्यामुळे त्यांना मतदारसंघात कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये सर्वाधिक पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत़--मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षनगर जिल्ह्याला बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने तीन मंत्री लाभले आहेत़ पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे़ हे मंत्री निधीसाठी सरकारकडे किती पाठपुरावा करतात, यावरच जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचे भवितव्य अवलंबून आहे़

 विरोधकांना आयते कोलीतविकास कामांना निधी मिळणार नाही़ आडातच नाही, तर पोहºयात येणार कुठून? अशी अवस्था आहे़ विकास कामे तर नाहीच, पण आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत़ त्यामुळे मतदारसंघातील विरोधकांना हे आयते कोलीत मिळाले असून त्यांच्याकडून आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल़ त्यामुळे आमदारांची दुहेरी कोंडी कोरोनामुळे होणार आहे़