शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाणी सोडले तर मंत्र्यांचे पुतळे जाळू : प्रहार जनशक्तीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:42 IST

जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडल्यास जलसंपदामंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करू, असा इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

अहमदनगर : जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडल्यास जलसंपदामंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करू, असा इशारा देत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, दारणा, गंगापूर, पानखेड या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात करण्यात येणार, याबाबतही सरकारने काहीही खुलासा केलेला नाही. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने यापूर्वी बाभळेश्वर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात लेखी निवेदनही दिले होते. मात्र, त्याला कोणतेच उत्तर मिळालेले नाही.आता जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करूननिवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन दिले.यावेळी प्रहारचे उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस, कृष्णा सातपुते, अभिजित दिघे, प्रदीप थोरात, अनिस तांबोळी, प्रकाश बेरड, गणेश कणसे, लक्ष्मण दिघे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय