शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तंत्रज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तर माणसाला आनंद -पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:13 IST

निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत असे प्रतिपादन  पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले .

निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत असे प्रतिपादन  पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले .

महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमांतर्गत आयोजित गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांच्या सत्कारसमारंभ कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनिल गाडे, सातारा यांनी केले. नेताजी डोंगळे, कोल्हापूर यांनी  स्वागत गीत गाऊन  पाहुण्यांचे स्वागत केले. आंतरजाल उपक्रम व सत्कार समारंभाची संकल्पना, माहिती भागवत घेवारे, उस्मानाबाद यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितली. प्रमुख पाहुण्यांची ओळख व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन  रंगनाथ सुंबे, अहमदनगर यांनी केले.आंतरजालच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात नंदिनी संतोष रोटे, आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद या विद्यार्थीनीचा आई-वडिलांसह सत्कार पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भागवत घेवारे सर यांनी केला. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक के.डी.पवार  व एन.एन.मुळे यांचा सन्मान रोप व पुस्तक देऊन घेवारे सर यांनी केला. 

गुणवंत विद्यार्थी नंदीनी रोटे व नेहा महाजन, चोपडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपक तोडकर, कोल्हापूर व के.डी.पवार सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध नवोपक्रमांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे पद्मश्री पोपटराव पवार यांनी *पर्यावरण संरक्षण :काळाची गरज* या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे यासाठी हिवरे बाजारमधील पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.चराईबंदी,कुऱ्हाडबंदी, बालवृक्षमित्र पुरस्कार असे अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धीबरोबरच गावाचं गावपण टिकविण्यासाठी, जपण्यासाठी विधायक कामांचा ध्यास विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.पाणी ही देशाची संपत्ती आहे. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिवरे बाजारमधील पाणी व्यवस्थापनाची माहिती त्यांनी दिली. असंख्य अडचणींमधून सध्या आपला देश जात आहे. अशावेळी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.सुमन गवळी ( पारनेर)  यांनी मानले. सूत्रसंचालन सचिन यादव, कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी मराठी भाषा अभ्यासगट सदस्य मोहन शिरसाट, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षक सतीश चिंदरकर, मुंबई यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून मराठी विषय शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले होते.तांत्रिक बाजू विजय सरगर , जी.एल.शिंदे ,कल्याणकस्तुरे यांनी पार पाडली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण