शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

तंत्रज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तर माणसाला आनंद -पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:13 IST

निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत असे प्रतिपादन  पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले .

निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत असे प्रतिपादन  पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले .

महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमांतर्गत आयोजित गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांच्या सत्कारसमारंभ कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुनिल गाडे, सातारा यांनी केले. नेताजी डोंगळे, कोल्हापूर यांनी  स्वागत गीत गाऊन  पाहुण्यांचे स्वागत केले. आंतरजाल उपक्रम व सत्कार समारंभाची संकल्पना, माहिती भागवत घेवारे, उस्मानाबाद यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितली. प्रमुख पाहुण्यांची ओळख व गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन  रंगनाथ सुंबे, अहमदनगर यांनी केले.आंतरजालच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात नंदिनी संतोष रोटे, आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद या विद्यार्थीनीचा आई-वडिलांसह सत्कार पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भागवत घेवारे सर यांनी केला. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक के.डी.पवार  व एन.एन.मुळे यांचा सन्मान रोप व पुस्तक देऊन घेवारे सर यांनी केला. 

गुणवंत विद्यार्थी नंदीनी रोटे व नेहा महाजन, चोपडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपक तोडकर, कोल्हापूर व के.डी.पवार सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध नवोपक्रमांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे पद्मश्री पोपटराव पवार यांनी *पर्यावरण संरक्षण :काळाची गरज* या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे यासाठी हिवरे बाजारमधील पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.चराईबंदी,कुऱ्हाडबंदी, बालवृक्षमित्र पुरस्कार असे अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धीबरोबरच गावाचं गावपण टिकविण्यासाठी, जपण्यासाठी विधायक कामांचा ध्यास विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.पाणी ही देशाची संपत्ती आहे. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिवरे बाजारमधील पाणी व्यवस्थापनाची माहिती त्यांनी दिली. असंख्य अडचणींमधून सध्या आपला देश जात आहे. अशावेळी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.सुमन गवळी ( पारनेर)  यांनी मानले. सूत्रसंचालन सचिन यादव, कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी मराठी भाषा अभ्यासगट सदस्य मोहन शिरसाट, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षक सतीश चिंदरकर, मुंबई यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून मराठी विषय शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले होते.तांत्रिक बाजू विजय सरगर , जी.एल.शिंदे ,कल्याणकस्तुरे यांनी पार पाडली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण