शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

आला रे आला पाऊस आला...

By admin | Updated: May 27, 2016 00:02 IST

अहमदनगर : दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला वरुणराजाने अखेर गुरुवारी सायंकाळी दिलासा दिला़ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़

अहमदनगर : दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला वरुणराजाने अखेर गुरुवारी सायंकाळी दिलासा दिला़ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़ राहुरी, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यात दमदार पाऊस झाला असून, बळीराजासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे़ पावसाचे आगमन झाल्याने आला रे आला, पाऊस आला, अशा भावना जिल्हाभरातून व्यक्त होत आहेत़ दरम्यान नगर शहरात रात्री उशिराने सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने नगरकरांची उकाड्यातून सुटका झाली़रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यात गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली़ रस्त्यातील सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती़ प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली़ त्यानंतर काही वेळातच नेवासा शहरासह परिसरातही हलक्या सरींनी पाऊस सुरू झाला़ पाथर्डी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला़ शहरासह माणिकदौंडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या़ पिरेवाडी येथे छाया बाबासाहेब पवार यांच्या सहा शेळ्या वीज पडून दगावल्या़ मोहरी गावात झालेल्या वादळामुळे घरावरील पत्रे उडाले़ अर्धा- पाऊणतास पाऊस सुरू होता़ अश्रूबा नजन यांच्या घराची भिंत पडून त्यांची सून व चार वर्षाचा नातू जखमी झाला़ गारांसह पाऊसराहुरी : गुरूवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यात गारांसह वादळी पाऊस झाला़ पावसामुळे राहुरीचा आठवडे बाजार वाहून गेला. गुरूवारी सायंकाळी आभाळ चांगलेच भरून आले होते. पावसाआधी सोसाट्याचा वारा सुटला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास गारांसह वादळी पावसास सुरूवात झाली. वादळामुळे काही झाडेही कोसळली़ त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाला़ पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. देसवंडी, आरडगाव, तांदूळवाडी, वळण, मानोरी, धामोरी आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.