शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मी चित्रपट इंडस्ट्रितल्या राजकारणाचा बळी

By admin | Updated: March 20, 2016 23:15 IST

विनोद गोळे, पारनेर मंगेश हाडवळे यांनी मला हिरो केले़ पण त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मला अभिनय क्षेत्रात प्रवेशच मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले.

विनोद गोळे, पारनेरमंगेश हाडवळे यांनी मला हिरो केले़ पण त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मला अभिनय क्षेत्रात प्रवेशच मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले. चित्रपट क्षेत्रातील राजकारणाचा ग्रामीण भागातील कलाकारांना फटका बसतो, अशी खंत देशाचा सर्वाेच्च राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या शरद गोयेकर याने व्यक्त केली़शरद गोयेकर याने ‘लोकमत’शी बोलताना ही खंत व्यक्त केली़ चित्रपट क्षेत्रातील अनेक कटू व चांगले प्रसंगही त्याने कथन केले. आठ वर्षापूर्वी टिंग्या चित्रपटातून गोयेकरची या झगमगत्या दुनियेत एन्ट्री झाली़ मात्र, त्यानंतर शरद गोयेकर पुढे एकाही चित्रपटात दिसला नाही़ सध्या तो अकरावीत शिक्षण घेत आहे़ अत्यंत प्रतिकुल परिस्थीवर मात करीत टिंग्या उर्फ शरद गोयेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. सर्वांत लहान दिग्दर्शक अशी नवी ओळख त्याला आता मिळाली आहे़ शरद गोयेकर पारनेर तालुक्यातील ढवळपुरीचा रहिवाशी. आठ वर्षांपूर्वी राजुरी (जि. पुणे) येथील दिग्दर्शक मंगेश हाडवळे याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या शरदला घेऊन टिंग्या हा चित्रपट बनविला आणि उत्कृष्ट अभियनाचा राष्ट्रीय बालकलाकार म्हणून गौरवही झाला. त्यानंतर त्याला अनेक सन्मान मिळाले. त्याची राज्यात टिंग्या म्हणूनच ओळख आहे. परंतु अभिनय क्षेत्रात पुरस्कार मिळवूनही टिंग्या चित्रपट क्षेत्रातून दूर कसा राहिला, यासह दिग्दर्शनातील भूमिकाही ‘लोकमत’शी बोलताना शरदने उघड केली. पाचवीला असताना टिंग्याने मला लोकप्रियता मिळवून दिली. त्यात झोपडीत राहणाऱ्या माझ्या आई, वडिलांना चार भिंतीचे घर रहायला मिळाले, हा त्यावेळचा आनंद ठरला. नंतर मला शिक्षणासाठी दत्तक घेणाऱ्या पाटील यांनी शरद गोयेकर नाव बदलून मोहित प्रकाश पाटील असे नाव बदलण्यास सांगितले. मी त्यास नकार दिला आणि तेथूनच माझ्या अभिनय क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या असे सांगताना फॅँड्रीसह अनेक पुरस्कारप्राप्त बालकलाकारांना पुढे चित्रपटात का घेतले नाही, असा सवालही त्याने केला. बब्या या चित्रपटाचे ढवळपुरी, आळेफाटा, साकूर, बेल्हा या भागात पन्नास टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे त्याने सांगितले.बालपण हरवलंटिंग्या म्हणून हिरो झाल्यावेळेस मी फक्त पाचवीत होतो, नंतर मी पुणे येथे वसतिगृहात राहून शिक्षण घेत होतो. त्यानंतर आलेल्या अनेक अडचणींमुळे मला बालपणाचा आनंदच घेता आला नाही. मी माझे बालपण हरवून बसलो, अशी व्यथा शरद गोयेकरने व्यक्त केली.