शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:21 IST

कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली.

अहमदनगर : कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ८ हजार ७०० शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार असून यासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोहोल्टचे स्वतंत्र रोहित्र या योजनेतून उभाण्यात येत आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढणे, आकडे टाकून वीजचोरीस वाव या बाबी टाळता येणार आहेत. योजनेतून उच्चदाब वाहिनीद्वारे थेट वीज पुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात घट व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होऊन पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.आॅक्टोबर-२०११ मध्ये पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या रवींद्र उकांडे यांना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या हस्ते वीजजोडणी देण्यात आली. १६ किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रावरून साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला ही जोडणी देऊन जिल्यात योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी अहमदनगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, सहायक अभियंता केतन देवरे, सरपंच तुळसाबाई जगताप, उपसरपंच अंकुश नवसूपे, कैलास वाळके, युवराज नवसूपे, रवींद्र उकांडे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा दाबाने तसेच ठरलेल्या कालावधीत सलग वीज मिळू शकेल. रोहित्र व वीजपंप जळण्याच्या कटकटीतुन सुटका होईल. - रवींद्र राजाराम उकांडे, शेतकरी, मठपिंप्री

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर