शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:21 IST

कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली.

अहमदनगर : कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ८ हजार ७०० शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार असून यासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोहोल्टचे स्वतंत्र रोहित्र या योजनेतून उभाण्यात येत आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढणे, आकडे टाकून वीजचोरीस वाव या बाबी टाळता येणार आहेत. योजनेतून उच्चदाब वाहिनीद्वारे थेट वीज पुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात घट व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होऊन पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.आॅक्टोबर-२०११ मध्ये पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या रवींद्र उकांडे यांना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या हस्ते वीजजोडणी देण्यात आली. १६ किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रावरून साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला ही जोडणी देऊन जिल्यात योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी अहमदनगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, सहायक अभियंता केतन देवरे, सरपंच तुळसाबाई जगताप, उपसरपंच अंकुश नवसूपे, कैलास वाळके, युवराज नवसूपे, रवींद्र उकांडे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा दाबाने तसेच ठरलेल्या कालावधीत सलग वीज मिळू शकेल. रोहित्र व वीजपंप जळण्याच्या कटकटीतुन सुटका होईल. - रवींद्र राजाराम उकांडे, शेतकरी, मठपिंप्री

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर