शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अहमदनगर जिल्ह्यात ‘एचव्हीडीएस’ योजनेस प्रारंभ : नगर तालुक्यातील रवींद्र उकांडे यांना मिळाली पहिली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:21 IST

कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली.

अहमदनगर : कृषिपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीमार्फत वीजजोडणी देण्याच्या योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली वीजजोडणी नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील रवींद्र राजाराम उकांडे यांना मंगळवारी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ८ हजार ७०० शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार असून यासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोहोल्टचे स्वतंत्र रोहित्र या योजनेतून उभाण्यात येत आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढणे, आकडे टाकून वीजचोरीस वाव या बाबी टाळता येणार आहेत. योजनेतून उच्चदाब वाहिनीद्वारे थेट वीज पुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात घट व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होऊन पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.आॅक्टोबर-२०११ मध्ये पैसे भरून जोडणी प्रलंबित असलेल्या रवींद्र उकांडे यांना मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या हस्ते वीजजोडणी देण्यात आली. १६ किलोव्होल्ट क्षमतेच्या रोहित्रावरून साडेसात हॉर्सपॉवरच्या कृषिपंपाला ही जोडणी देऊन जिल्यात योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी अहमदनगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी, उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, सहायक अभियंता केतन देवरे, सरपंच तुळसाबाई जगताप, उपसरपंच अंकुश नवसूपे, कैलास वाळके, युवराज नवसूपे, रवींद्र उकांडे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे. पुरेशा दाबाने तसेच ठरलेल्या कालावधीत सलग वीज मिळू शकेल. रोहित्र व वीजपंप जळण्याच्या कटकटीतुन सुटका होईल. - रवींद्र राजाराम उकांडे, शेतकरी, मठपिंप्री

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर