शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जन्मदात्रीला निरोप देता-देता पतीनेही जग सोडले; दुर्दैवी महिलेची कहाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:20 IST

जन्मदात्री आईने आठ दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. त्या दुखातून सावरत नाही तोच तिच्या आयुष्याचा आधार असलेला पतीही जग सोडून गेला.

कोल्हार : जन्मदात्री आईने आठ दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. त्या दुखातून सावरत नाही तोच तिच्या आयुष्याचा आधार असलेला पतीही जग सोडून गेला. या दोन्ही दुर्दैवी घटनेमुळे नियतीने ओढवलेल्या दु:खातून सावरायचे कसे अन जगायचे कसे ? असा प्रश्न कोल्हार येथील छाया ताराचंद सुरसे यांना पडला आहे.कोल्हार येथे वास्तव्यास असलेल्या छाया ताराचंद सुरसे यांच्या आयुष्यात अचानक आभाळ कोसळले. छाया यांचे माहेर राहाता तालुक्यातील सावळीविहीर. आठ दिवसांपूर्वी त्यांची आई सिंधुबाई बाबूराव जगताप यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे छाया माहेरी होत्या. शनिवारी (दि.९) त्यांच्या आईचा दशक्रिया विधी होता. तोच आईच्या दु:खातून न सावरलेल्या छाया यांच्यावर काळाने दुसरा मोठा आघात केला. आयुष्याचा जोडीदार असलेला  पती ताराचंद यांनी कोल्हार येथील राहत्या घरात गुरुवारी गळफास घेऊन कायमची साथ सोडली.नाभिक संघटनेचा तालुका अध्यक्ष असलेले ताराचंद यांचे केवळ नाभिक समाजच नाही तर गावातील प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध होते. सामाजिक कामात अग्रेसर असलेले अन मितभाषी, हसतमुख असलेल्या ताराचंद यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. ताराचंद यांच्या पाठीमागे आई, मुलगा, मुलगी आहे. बापाच्या अशा यावेळी जाण्याने ही मुलं सुद्धा पोरकी झाली आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने छायाने जमेल ती कामे करून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. आजही अनेकांना जेवणाचे डब्बे बनवून देण्याचे काम छाया करतात. शेखर व शुभम ही मुलेही शिक्षणासोबत वडिलांना सलूनच्या दुकानात कामात मदत करीत होती. अगोदर आईची छाया, त्यानंतर पतीची छाया हरपल्याने कुटुंब दु:खात हरवले आहे. 

टॅग्स :rahaataराहाताAhmednagarअहमदनगर