शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

देवळालीजवळील अपघातात पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 19:56 IST

राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रोडवर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पती-पत्नी दोघेजण जागीच ठार झाले. घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भारत शंकर वाघापुरे (वय ६०) आणि अनिता भारत वाघापूरे (वय ५५, राहणार देवळाली प्रवरा, खटकळी) अशी मृतांची नावे आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रोडवर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पती-पत्नी दोघेजण जागीच ठार झाले. घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भारत शंकर वाघापुरे (वय ६०) आणि अनिता भारत वाघापूरे (वय ५५, राहणार देवळाली प्रवरा, खटकळी) अशी मृतांची नावे आहेत. देवळाली प्रवरा येथील खटकळी येथील रहिवासी असलेले पती-पत्नी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान बजाज एम एटी (क्रमांक एम. एच. १७ एच. ६२०) या दुचाकीवर बसून राहुरी फॅक्टरी येथे दवाखान्यात जात होते. इरिगेशन बंगल्या समोर चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच. १७ डी. एक्स. ९७९७) या चारचाकी वाहनाने त्यांना समोरून जोराची धडक दिली. या धडकेने ते १०० फूट लांब फेकले गेले आणि जागेवरच ठार झाले आहेत. तर मोटरसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.  हे पती-पत्नींना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी तपासणी केली. मात्र नेहमी प्रमाणे ग्रामीण रूग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने अपघात झालेल्या पती-पत्नीचा इसीजी काढता आला नाही. त्यामुळे सदर अपघात झालेले दोघे मृत आहेत की जिवंत आहेत, याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी दिली नाही. शहरातील इतर दवाखाने बंद असल्याने उशीरापर्यंत इसीजी करता आला नाही. बराच वेळ मृतदेह ग्रामीण रूग्णालया समोर अ‍ॅम्बूलन्समध्ये पडून होते. यावेळी त्यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. यामुळे पुन्हा एकदा राहुरी ग्रामीण रूग्णालयाचा कारभार समोर आला आहे.--फोटो- अपघातात ठार झालेल्या पती-पत्नींचे मृतदेह रुग्णवाहिकेमध्येच होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही वेळ लागल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले.