शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) ...

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) व सोमवारी (दि.१७) जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा व झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

‘ताैउते’ चक्रीवादळ हे राज्याच्या किनारपट्टीने पुढे सरकत जाणार आहे. रविवारी सकाळी गोवा किनारपट्टीपासून हे वादळ पुढे सरकून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत धडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजेनंतर नगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दीड वाजेपर्यंत ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे काही प्रमाणात झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत, तसेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ मुंबई किनारपट्टीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. कोकण ते मुंबई किनारपट्टीदरम्यान हे वादळ असताना नगर जिल्ह्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई किनारपट्टीने हे वादळ पुढे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर वाऱ्याचा वेगही मंदावणार असल्याचे सांगण्यात आले.

..............

महावितरणची तयारी काय

जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असून, ग्रामीण भागात अनेक रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणला खबरदारीच्या उपाययोजनांबाबत काहीही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, ऐनवेळी सोसाट्याचा वारा वाढला, तर विद्युत पुरवठा खंडित करावा लागेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित केल्यास ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील व्यवस्था ठप्प पडू शकते.

.................

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर गेलेले असाल तर पाऊस व सोसाट्याचा वारा असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.

वीजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर बोलू नये, विद्युत उपकरणांपासून दूर थांबावे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणांचा आसरा घेऊ नये. पर्यटनस्थळी, नदी-नाले येथे जाऊ नये.

.............

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी जागरूक राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.