शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) ...

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) व सोमवारी (दि.१७) जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा व झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

‘ताैउते’ चक्रीवादळ हे राज्याच्या किनारपट्टीने पुढे सरकत जाणार आहे. रविवारी सकाळी गोवा किनारपट्टीपासून हे वादळ पुढे सरकून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत धडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजेनंतर नगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दीड वाजेपर्यंत ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे काही प्रमाणात झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत, तसेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ मुंबई किनारपट्टीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. कोकण ते मुंबई किनारपट्टीदरम्यान हे वादळ असताना नगर जिल्ह्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई किनारपट्टीने हे वादळ पुढे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर वाऱ्याचा वेगही मंदावणार असल्याचे सांगण्यात आले.

..............

महावितरणची तयारी काय

जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असून, ग्रामीण भागात अनेक रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणला खबरदारीच्या उपाययोजनांबाबत काहीही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, ऐनवेळी सोसाट्याचा वारा वाढला, तर विद्युत पुरवठा खंडित करावा लागेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित केल्यास ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील व्यवस्था ठप्प पडू शकते.

.................

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर गेलेले असाल तर पाऊस व सोसाट्याचा वारा असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.

वीजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर बोलू नये, विद्युत उपकरणांपासून दूर थांबावे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणांचा आसरा घेऊ नये. पर्यटनस्थळी, नदी-नाले येथे जाऊ नये.

.............

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी जागरूक राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.