शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

‘ताैउते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घोंगावणार सोसाट्याचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) ...

अहमदनगर : अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘ताैउते’ चक्रीवादळाचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यातही उमटणार असून, रविवारी (दि.१७) व सोमवारी (दि.१७) जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा व झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

‘ताैउते’ चक्रीवादळ हे राज्याच्या किनारपट्टीने पुढे सरकत जाणार आहे. रविवारी सकाळी गोवा किनारपट्टीपासून हे वादळ पुढे सरकून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत धडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजेनंतर नगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दीड वाजेपर्यंत ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे काही प्रमाणात झाडांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत, तसेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी हे वादळ मुंबई किनारपट्टीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. कोकण ते मुंबई किनारपट्टीदरम्यान हे वादळ असताना नगर जिल्ह्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई किनारपट्टीने हे वादळ पुढे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर वाऱ्याचा वेगही मंदावणार असल्याचे सांगण्यात आले.

..............

महावितरणची तयारी काय

जिल्ह्यात काेरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असून, ग्रामीण भागात अनेक रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणला खबरदारीच्या उपाययोजनांबाबत काहीही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, ऐनवेळी सोसाट्याचा वारा वाढला, तर विद्युत पुरवठा खंडित करावा लागेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अचानक विद्युतपुरवठा खंडित केल्यास ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील व्यवस्था ठप्प पडू शकते.

.................

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर गेलेले असाल तर पाऊस व सोसाट्याचा वारा असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.

वीजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर बोलू नये, विद्युत उपकरणांपासून दूर थांबावे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणांचा आसरा घेऊ नये. पर्यटनस्थळी, नदी-नाले येथे जाऊ नये.

.............

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी जागरूक राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.