शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी"

By साहेबराव नरसाळे | Updated: February 28, 2023 16:24 IST

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या ...

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यसाठी महिला आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये दिली. राज्य महिला आयोग आपल्या दरी या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

चाकणकर म्हणाल्या, ओमान या देशात फसवून नेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ महिला आयोगाला आला होता. त्यावरून संबंधित महिलेचा शोध घेतला असता ती त्या जागेवर आढळून आली नाही. राज्यातील महिलांना परदेशात काम देतो, असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांचे कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांना अत्यंत छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ आम्हाला आला होता. त्यावरून मुंबईत ओशिवरा पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या महिलांच्या शोधासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला आयोग पाठपुरावा करीत आहे. पुढील ५ ते ६ महिन्यात सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित होते.