शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

किती दिवस करायचा अभ्यास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने आधीच रद्द केलेल्या आहेत. आता केवळ बारावीच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष ...

पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने आधीच रद्द केलेल्या आहेत. आता केवळ बारावीच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीबीएसई बोर्डाने प्रथम दहावीची परीक्षा रद्द केली, त्यानंतर राज्य बोर्डाने दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता जूनमध्ये बारावीची परीक्षा होणार असल्याचे बोलले जात असले तरी सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेते, यावर राज्य शासनाची भूमिका ठरणार असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे जून महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही तर परीक्षा रद्द करण्याचाही विचार पुढे येत आहे. परंतु बारावी परीक्षेचे गुण, त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे गुण आवश्यक असतात. त्यामुळे मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा होणे गरजेचे आहे, असेही काही पालकांसह तज्ज्ञांचे मत आहे .

एकंदरीत परीक्षेबाबत शासनासह कोणीच काही जाहीर केले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. इतर विद्यार्थ्यांना सुट्या लागलेल्या असताना आपण किती दिवस अभ्यास करायचा? परीक्षा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे अभ्यास करावा की नाही अशा संभ्रमावस्थेत विद्यार्थी असून अनेकांचे पालकही त्यामुळे गोंधळले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होत आहे. शासनाने काय तो निर्णय एकदाचा जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

-----------

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - ४५०

बारावीसाठी प्रविष्ट विद्यार्थी- ६४,१२७

---------------

एक तर बराचसा अभ्यास ऑनलाईन शिकवला. ग्रामीण भागात नेटवर्क नाही. पालक, शिक्षक सांगतात अभ्यास करा, परीक्षा होणार? आहेत. पण परीक्षा कधी होणार? आता अभ्यास तरी किती दिवस करायचा, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना पडला आहे.

- दीक्षा पवार, विद्यार्थिनी, भंडारदरा, अकोले

---------

बारावी परीक्षेबाबत अद्याप तरी धोरण निश्चित झालेले नाही. विद्यार्थी सध्या अभ्यास करत असले तरी त्यांची मानसिकता विचारात घेता परीक्षेबाबत निर्णय शासनाने लवकरात लवकर जाहीर करणे गरजेचे आहे.

- प्रा. महेश पाडेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भंडारदरा

--------------

नगर जिल्ह्यातून बारावीसाठी ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीची परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबत काहीही सूचना दिलेल्या नाहीत. शिक्षण विभागाची मात्र सर्व तयारी आहे.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक