शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

...आम्ही अभ्यास तरी किती दिवस करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षासह एमपीएससी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेवगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षासह एमपीएससी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा तूर्तास स्थगित ठेवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण घेऊन आज ना उद्या परीक्षा होतील, या अपेक्षेने अभ्यास सुरु ठेवला आहे. मात्र आम्हाला आणखी किती दिवस अभ्यास करावा लागणार? असा सवाल विद्यार्थी करीत आहेत.

मागील वर्षी कोरोना आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन २३ मार्च रोजी शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करत इयत्ता ९ ते १२ पर्यंत वर्ग भरण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान कोरोना आजाराने डोकेवर काढताच पुन्हा शाळा अवघ्या काही महिन्यात बंद करण्यात आल्या. दरम्यान शिक्षण विभागाकडून शिक्षक व विद्यार्थी यांच्या लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व सूचनांचा विचार करुन २९ एप्रिल ते २० मे दरम्यान इयत्ता दहावी परीक्षाचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. कोरोना दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचे सांगितले.

परिणामी, विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शैक्षणिक वर्षात कधीकधी ऑनलाईन तर जेमतेम दोन महिने शाळेत धडे मिळाले. मात्र ते शिक्षण किती विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिले हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक दिशा ठरवून चांगले गुण संपादन करावयाचे हे स्वप्न पाहून अभ्यासावर भर दिला आहे. मात्र कोरोना परिस्थिती कधी निवळणार, कधी परीक्षा होणार या विवंचनेत आणखी किती काळ दहावीचा अभ्यास करत बसावा लागणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

----- -