शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घोड धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:46 IST

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे. धरणातून १० हजार ४४० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.घोड नदीवर १९६५ च्या सुमारास ७ हजार ६३८ दशलक्ष घनफू ट क्षमतेचे मातीचा भराव असलेले २९ दरवाजे असलेले हे धरण चिंचणी येथे बांधण्यात आले. या धरणास ३२ किलोमीटर लांबी असलेला उजवा तर ८६ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आहे. धरणातून १९६८ ला शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. सन १९६८ ते २०१८ दरम्यान ५० वर्षे पूर्ण केल्याने हे धरण यावर्षी अर्ध शतक साजरे करीत आहे. यामध्ये ४१ वेळा धरण ओव्हरफ्लो झाले. यामध्ये १९७१ व १९८३ ला घोड धरणातून एक लाख क्यूसेसपेक्षा जादा पाणी घोड नदीत सोडण्यात आले. त्यामुळे काष्टी, गावठाण परिसरात राहणाऱ्या सुमारे चारशे कुटूंबांचे स्थलांतर करावे लागले होते.या धरणातील पाणी साठ्यावर तयार झालेल्या उसावर नागवडे, घोडगंगा व अंबालिका या तीन साखर कारखान्यांचे चक्र फिरले आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला दिशा मिळाली आहे. घोड धरण १०० टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांनी जल्लोष केला आहे.कुकडी धरण ८० टक्के भरलेकुकडी प्रकल्पातील डिंबे वडज व येडगाव धरण १०० भरले आहे. माणिकडोह ६६ टक्के, तर पिंपळगाव जोगे धरण ४७ टक्के भरले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कुकडी प्रकल्पात २ टक्के जादा उपयुक्त पाणी साठा आहे.घोड नदीकाठी सावधगिरीडिंभे, येडगाव, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. घोड धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बुधवारी सकाळी घोड धरण ओव्हरफ्लो झाले. नदीत सोडण्यात येणा-या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. वरच्या भागातून जादा पाणी आले तर, घोड धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन शिरूरच्या घोड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश लंकेश्वर यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा