शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माऊंट आबो येथून परतलेल्या राहुरी तालूक्यातील ३६ नागरीक होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:43 IST

राहुरी - माऊंट आबो येथून राहुरी येथे परत आलेल्या तालूक्यातील सुमारे ३६ प्रवाशांना प्रशासनाने दिनांक १ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना १५ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून नागरीक भयभीत झाले आहेत. 

राहुरी - माऊंट आबो येथून राहुरी येथे परत आलेल्या तालूक्यातील सुमारे ३६ प्रवाशांना प्रशासनाने दिनांक १ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना १५ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून नागरीक भयभीत झाले आहेत. 

सुमारे दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो नागरिक राजस्थान येथील माऊंट आबो येथे गेले होते. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील २९ नागरीक सामील होते. अचानक झालेल्या लाॅकडाऊनमुळे सर्व जण त्या ठिकाणी अडकून पडले होते. आज दिनांक १ मे रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर सर्व नागरीक एस टी बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये परतले. त्या बरोबर राहुरी तालुक्यातील २९ जण आले आहेत. राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सदर वाहने नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बस स्थानक येथे थांबवली. त्यानंतर सर्व जणांची राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. ते सर्व जण बसून आलेल्या वाहनांना राहुरी नगरपरिषद कर्मचार्यांनी पूर्णपणे फवारणी करून सॅनिटायझर केले. तसेच काही जणांना अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. अशी माहिती समजली आहे.

        मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत तहसीलदार फसिओद्दीन शेख हे सर्वच बारीक सारीक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये. यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख हे आपल्या जिवाचं रान करीत आहे.