शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

मराठ्यांचा इतिहास पराक्रमाचा

By admin | Updated: December 24, 2015 23:38 IST

संगमनेर : मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या थोर पराक्रमाचा असून तो जाणीवपूर्वक समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

संगमनेर : मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या थोर पराक्रमाचा असून तो जाणीवपूर्वक समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा रविवारी पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर प्रकाश बर्डे, प्रा. ओंकार बिहाणी, डॉ. संतोष खेडलेकर, अनिल राठी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याचा स्वभाव नव्हता. परंतु मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा, या उद्देशाने ‘पानिपत’ कादंबरी लिहिली. माझ्या साहित्यात गणगोतातील जवळच्या व्यक्तीरेखा सापडल्या. ‘झाडाझडती’च्या रुपाने गावच्या लोकजीवनाचे वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केला. गावाकडच्या मातीत स्वत:चे बाळंतपण स्वत:च करून दगडाने नाळ तोडणारी स्री पाहिली. मराठी भाषा ही उत्तम असून व्यक्तीरेखेप्रमाणे ती बदलल्यास साहित्य दर्जेदार बनते. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. केसभराच्या चुकीला देखील त्यात माफी नसते. गिरणी कामगारांचे वास्तव ‘लस्ट फॉर लालबाग’ मधून लिहिले. सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तववादी जीवनावरील ‘महानायक’ कादंबरीची निर्मिती झाली. संभाजीराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘संभाजी’ कादंबरी लिहिली. साहित्यिकाने सत्य मांडताना कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मात्र त्याचा विचार करू नये. प्रशासकीय अधिकारी असल्याने येणाऱ्या लोकांच्या तक्रारीतील भाषेचा साहित्यात उपयोग करता आला, असे सांगत पाटील यांनी आपल्या साहित्य प्रवासाचे वर्णन केले. व्याख्यानास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)