शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:30 IST

यशकथा :  या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

भारतात पूर्वी ४९ देशी गोवंश जाती होत्या. पैकी सध्या ४० जाती अस्तित्वात आहेत. यातील गीर, काँक्रेज, खिलारी अशा ६४ देशी गावरान गायींचा मुक्त गोठा अकोले तालुक्यातील कोकणेवाडी-धांदरफळ शिवारात एका उच्चशिक्षित तरुणाने तयार केला आहे. यात ८० रुपये लिटर दूध, तीन हजार रुपये किलो गावरान तूप अन् ३० रुपये लिटर ब्रह्ममुहूर्तावर धरलेल्या गोमूत्रातून त्यास चांगला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे. 

अकोले-संगमनेर रस्त्यालगत कोकणेवाडी-धांदरफळ शिवारातील शुभम् भास्कर घुले हा तरुण पुण्याच्या ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडला. पारंपरिक शेतीला पूरक जोडधंदा गोपालन करण्यासाठी त्याने राज्यातील व गुजरातमधील देशी गायीचे गोठे अभ्यासले. वडिलांच्या मार्गदर्शनाने चुलते सुदाम यांच्या सोबतीने पूर्वीच्या १९ जर्सी गायींच्या गोठ्याच्या आर्थिक कुबड्यांवर त्याने ‘निमाई’ नावाचा गोठा तयार केला. या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला. 

जर्सी गायीच्या दुधात ‘हिस्टाडींन’असते, ते मानवी शरीरावर विपरीत परिणाम करू शकते.  तर गावरान देशी गायीच्या दुधात ‘प्रोलिटिंग’असते ते आरोग्यवर्धक असते. याचा अभ्यास करून त्याने साधारण ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांना एक गाय अशा ६४ गायी गुजरात राज्यातून आणल्या आहेत. ३ लाख रुपये किमतीचा ‘वळू’देखील गोठ्यात आहे. चारा काढणे, चारा घालणे, शेण काढणे, गायींची धार काढणे, गोमूत्र धरणे ही सर्व कामे हातानेच केली जातात. यंत्राने दूध काढले जात नाही. 

शुभमने सुरू केलेल्या या गोठ्यामुळे घरातील माणसांसह आजूबाजूच्या २०-२५ लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. गायींच्या कासाच्या आजाराचा प्रश्न असतो. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. मका, गुजरातमधून आणलेला सुका चारा, शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मणी, कडुलिंब व शेवग्याचा पाला, कॅल्शियम वाढीसाठी चुना, असा पोषक चारा गायींना दिला जातो. संस्कृत स्रोत संगीत ऐकवले जाते. यातून गोठ्याची शुद्धता व गोठ्याचे पावित्र्य जपले जाते.

एक गाय साधारण दहा लिटर दूध दोन वेळेला देते. ४.६ ते ५.०  दुधाला फॅट मिळते. सध्या १७५ लिटर दूध उत्पादित होत असून, ५० लिटर दूध संगमनेर शहरात विकले जाते. इतर दुधाचे पारंपरिक पद्धतीने तूप बनवले जात आहे. साधारण एक लिटर दूध निर्मितीला ५९ रुपये खर्च येतो. सध्या ८० रुपये लिटर दूध, ३ हजार रुपये किलो तूप, ३० रुपये लिटर गोमूत्र, ३ हजार रुपये टन शेण विकले जाते. 

१३ ते १४  वेतानंतर गाय भाकड होते. या गायींच्या सहवासात अर्धा तास राहिले तरी उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. शुद्धता पाळली, तर हा व्यवसाय कधीच तोट्यात जाणार नाही. तूप महाग असले तरी ग्राहकांना तुपासाठी प्रतीक्षा करावी लागते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसली आणि औषधासाठी तूप हवे असल्यास त्याला पैशांची सक्ती केली जात नाही, असे शुभम घुले यांनी सांगितले.