शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पूरग्रस्तांसाठी नगरमधून मदतीचा ओघ : ग्रामसेवकांची ३ कोेटींची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:00 IST

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़

अहमदनगर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू सोमवारी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़पहिल्या टप्प्यातील मदत पाठविण्यात येणार असून, मदतीचे आवाहन राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे़कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्य भावनेने मदतीचा हात दिला आहे. सुमारे तीन कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतल्याची माहिती राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली़पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामसेवक युनियनने पत्र देऊन राज्यातील ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन देणार असल्याचे कळविले आहे़ त्यानुसार २२ हजार ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंतीही युनियनने सरकारला केली आहे. ही मदत सुमारे ३ कोटी रुपये इतकी होत आहे़ देशाप्रती व समाजाप्रती संवेदना जागृत असलेला ग्रामसेवक संवर्ग कर्तव्यापलिकडे जाऊन योगदान देत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ढाकणे म्हणाले़गणेश मंडळांचे कार्यकर्ते धावले मदतीलामाजी नगरसेवक निखील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देऊ मदतीचा हात’ मोहीम हाती घेण्यात आली आहे़ प्रभाग क्रमांक २ मधील गणेश मंडळांनी रविवारी ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले़ तसेच मदत फेरी काढून मदत जमा केली़ यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ब्लँकेट, जर्किन, लहान मुलांचे कपडे, औषधे, बाटली बंद पाण्याचे बॉक्स, संसार उपयोगी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा केले आहेत, अशी माहिती वारे यांनी दिली़ सोमवारी निर्मलनगर येथील गाडेकर चौकांसह अन्य ठिकाणीही मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपल्याकडील वस्तू जमा कराव्यात, असे आवाहन वारे यांनी केले आहे़शिवसेना पाठविणार ट्रकभर बाटलीबंद पाणी, औषधेशिवसेनेच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच सेनेच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते़ चितळे रस्त्यावरील शिवालयात ही मदत जमा केली जात आहे़ सध्या पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी व औषधांची आवश्यकता आहे़ एक ट्रकभर बाटलीबंद पाण्याचे बॉक्स सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी चितळे रस्त्यावरील शिवालयात संपर्क करावा, असे आवाहन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले़आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनतर्फे मदत केंद्र सुरूकोल्हापूर, सोलापूर आणि सांगली, या जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनच्या वतीने सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे रविवारी सकाळीच मदत केंद्र उभारण्यात आले होते़ या केंद्रावर दिवसभरात एक ट्रक साहित्य जमा झाले असून, बाटलीबंद पाण्याचे बॉक्स, औषधे, कपडे, अन्नधान्य, बिस्कीटस आदी साहित्य नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत़ असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, सचिव अदिनाथ दहीफळे, भूषण पांडे, अभिजित देवी, अन्वर शेख, जोएब खान, सचदेव पवार, अंकुश पालवे, प्रदीप तांदळे, प्रशांत आढाव, अशोक सातकर, मकरंद देशपांडे, अनिल मुरकुटे आदींनी नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले असून, प्रतिसाद मिळत आहे़राष्ट्रवादी पाठविणार मदतराष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते़ त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत़ आमदार संग्राम जगताप मित्रमंडळाकडे बाटलीबंद पाणी, कपडे, बिस्किटचे पुड्यांचे बॉक्स, औषधे, खाद्यपदार्थ आदी ट्रकभर साहित्य जमा झाले आहे़ ते सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येईल. मदतकार्य सुरू राहणार असून, नागरिकांनी मदत करावी असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.पूरग्रस्तांसाठी सरसावले नवनागापूरचे नागरिकसांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील प्रा. स्नेहल निर्मळ यांनी शुक्रवारी नवनागापूर भागातील जय मल्हारनगरमध्ये मदत फेरी काढली. या मदतफेरीमध्ये नागरिकांकडे तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स आदी साहित्य देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० किलो पेक्षा जास्त तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स दिले. या मदतकार्यामध्ये प्रणल मेहेर, तेजस्वी गाढवे, प्रा. राज सरोदे यांनी सहभाग नोंदवला. ही मदत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्याकडे देण्यात आल्याचे प्रा. निर्मळ यांनी सांगितले.मदतीसाठी सरसावले हिंगणगावनगर तालुक्यातीलहिंगणगाव येथे हरिनाम सप्ताहात ह.भ.प.बबन महाराज खेडकर यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्रातील सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनबाबत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तसेच यांच्या वाणीतून पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. कीर्तन सुरू असताना महाराजांनी देखील ग्रामस्थांना मदतीची हाक दिली. या हाकेला ओ देताच दिवसभरात चार लाख रुपये किमतीचे साहित्य जमा झाले. गावातील एक टेम्पो तसेच त्यांच्याबरोबर आठ ते दहा संयोजक मंडळी प्रत्यक्षात जाऊन या वस्तूंचे वाटप करणार आहेत. मदत गोळा करण्यासाठी गावचे सरपंच आबासाहेब सोनवणे, उपसरपंच बाळासाहेब ढगे, दिलीप झावरे, मुकुंद दुबे, मनोज सोनवणे, बाळासाहेब पानसरे, वैभव ताकपेरे, जानकु शिंदे, रावा सोनवणे, जयवंत सोनवणे, बबन सोनवणे, पोपट ढगे, अर्जुन अडसूळ, शिवदास त्रिंबके, निसार पठाण, एकनाथ झावरे, अर्जुन पादीर, दत्तु सोनवणे, दादाभाऊ सोनवणे, संजय झावरे, सीताराम लोंढे, ज्ञानदेव वाघमारे, बाबा सोनवणे गुरुजी,प् ाांडुरंग सोनवणे,विश्वनाथ सोनवणे, संभाजी कोल्हे, अंजु सोनवणे, संजय शिंदे, शरद सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, बजरंग सोनवणे, चंदू पानसरे, साहिल पठाण, मदन फलके, निलेश सोनवणे याच बरोबर महिला भगिनी माजी सरपंच स्मिता सोनवणे, विद्यमान उपसरपंच आशाबाई ढगे, सुनिता मोरे, सुवर्णा दुबे, वंदना कांबळे, सरस्वती अडसूळ, मनिषा सोनवणे, छाया कांबळे, ज्योती सोनवणे, माया शेळके, जया कांडेकर यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय