शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 20:36 IST

शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.  शेवगाव तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.  शेवगाव तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने लोकांची चांगलीच धावपळ उडाली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेलेल्या नागरिकही पावसात अडकून पडले.

यंदा नगर जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातही परतीचा मान्सूनचा मुककाम चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली असून विसर्ग सुरु आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं.  सायंकाळी सहा वाजल्यानंतर ढग अधिक गडद झाले. श्रीगोदा तालुक्यातील कोळगाव, घारगाव व विसापूर परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसेच नगर तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट व वा-याच्या वेग असल्याने उसाचीही पडझड झाली आहे. नगर शहरात सात वाजता अचानक पावसास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. कर्जत, जामखेड, राहुरी, अकोले, संगमनेर , राहाता तालुक्यातील विविध भागाला पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. नगर जिल्ह्यात आतापर्यत तब्बल ७७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जामखेड व अकोले तालुक्यात सरासरी एक हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 

गेल्या चार ते पाच महिन्यापासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून पावसाचा जोर कायम असल्याने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासकिय यंत्रणेने पाहणी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गतवर्र्षीपेक्षा ज्वारीचे क्षेत्र घटणार असून हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.