शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

जायकवाडीच्या पाण्याबाबत प्राधिकरणाची सुनावणी

By admin | Updated: November 6, 2014 14:39 IST

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनी गोदावरी खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी वाटप होण्याबाबत प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे. श्रीरामपूरचा अशोक सहकारी साखर कारखान्यासह कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचे भाऊसाहेब दौंड, दशरथ पिसे या शेतकर्‍यांसह एकूण १७ जण याचिकादार, सहयाचिकादार आहेत. 
१९ सप्टेंबरला प्राधिकरणाने औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात संबंधित मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्यासोबत जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. तसेच महामंडळाने १४ ऑक्टोबरला राज्य सरकारकडे काही मुद्यांबाबत स्पष्टीकरण मागविले होते. त्यावर राज्य सरकारने स्वत:चे मत न देता उलटपक्षी महामंडळास
प्राधिकरणाकडूनच स्पष्ट आदेश मिळविण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार महामंडळाने प्राधिकरणास २७ ऑक्टोबरला याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने येत्या ११ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता याबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे अहमदनगर जिलतील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह, साखर कारखाने व इतर पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.