शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्याबाबत प्राधिकरणाची सुनावणी

By admin | Updated: November 6, 2014 14:39 IST

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे.

गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनी गोदावरी खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी वाटप होण्याबाबत प्राधिकरणात याचिका दाखल केली आहे. श्रीरामपूरचा अशोक सहकारी साखर कारखान्यासह कोपरगावचा संजीवनी सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचे भाऊसाहेब दौंड, दशरथ पिसे या शेतकर्‍यांसह एकूण १७ जण याचिकादार, सहयाचिकादार आहेत. 
१९ सप्टेंबरला प्राधिकरणाने औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात संबंधित मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्यासोबत जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. तसेच महामंडळाने १४ ऑक्टोबरला राज्य सरकारकडे काही मुद्यांबाबत स्पष्टीकरण मागविले होते. त्यावर राज्य सरकारने स्वत:चे मत न देता उलटपक्षी महामंडळास
प्राधिकरणाकडूनच स्पष्ट आदेश मिळविण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार महामंडळाने प्राधिकरणास २७ ऑक्टोबरला याबाबत योग्य ते स्पष्टीकरण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने येत्या ११ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता याबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे अहमदनगर जिलतील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह, साखर कारखाने व इतर पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.