शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या कामकाजाचे वाभाडे

By admin | Updated: October 18, 2014 23:52 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या १५ दिवस आधी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करून तो तालुकास्तरावर पाठविण्यात आला

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या १५ दिवस आधी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करून तो तालुकास्तरावर पाठविण्यात आला होता. मात्र, अद्यापही हा निधी ग्रामपंचायत स्तरावर पोहचलेला नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांमुळे हा निधी रखडला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली स्थायी समितीची बैठक झाली. यात सदस्य बाळासाहेब हराळ आणि राजेंद्र फाळके यांनी हा विषय उपस्थित केला. महिनाभरापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेचा विषय चांगलाच गाजला होता. जिल्हास्तरावरून चुकीच्या निकषांच्या आधारे निधीचे वितरण करण्यात आले असल्याचा आक्षेप यावेळी घेण्यात आला होता. त्यावेळी समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांना लक्ष करण्यात आले होते. त्यानंतर योजनेच्या आराखड्यात बदल करण्यात आला. तसेच निधी मंजूर करून तातडीने तालुकास्तरावर पाठविण्यात आला. मात्र, महिनाभरानंतर हा निधी आहे, त्या ठिकाणी पडून आहे. यामुळे संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली.ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय जात नाहीत. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, याची कल्पना नाही. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही. यामुळेच नगर तालुक्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होऊन आरोग्य विभाग गाफील राहिले असल्याचा आरोप हराळ यांनी केला. त्यावर प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठ दिवसांतून एकदा प्रत्येक उपकेंद्रात उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले. बैठकीला नूतन सभापती मीरा चकोर, सदस्य विठ्ठलराव लंघे, सत्यजित तांबे, सुजित झावरे गैरहजर होते. तर उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती नंदा वारे, शरद नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)