शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीमुळे डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. लॉकडाऊनमुळे ...

श्रीरामपूर : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. लॉकडाऊनमुळे पेट्रोलची मागणी घटल्याचे कारण पुढे करून तेल कंपन्यांनी इथेनॉल वेळेवर व पूर्ण क्षमतेने उचलले नाही.

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बी ग्रेडच्या उत्पादनाला ५४ रुपये लिटर, तर सी ग्रेडला ४४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखरेचा साठा पडून होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवरा, अशोक, सहकार महर्षी कोल्हे, गंगामाई, अंबालिका या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवरच भर दिला. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामामध्ये या कारखान्यांनी चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली.

---------

लॉकडाऊनचा फटका

पेट्रोलियम कंपन्या साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवून देतात. त्याच्या ९५ टक्के पुरवठा करणे कारखान्यांना बंधनकारक असते. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने यंदा पेट्रोलचा खप कमी झाला. पर्यायाने पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलची मागणी घटली.

---------

५० टक्क्यांहून कमी उठाव

तेल कंपन्यांनी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडील ५० टक्केपेक्षा कमी इथेनॉल आजअखेर खरेदी केले आहे. त्यामुळे साखरेऐवजी इथेनॉलकडे वळूनही कारखान्यांना लाभ झालेला नाही.

----------

इथेनॉलचे उत्पादन

अंबालिका : १ कोटी ५४ लाख

महर्षी कोल्हे : ५९ लाख

प्रवरा : ११ लाख

अशोक : २३ लाख

गंगामाई : १ कोटी ८३ लाख

---------

इथेनॉलची घटलेली मागणी हा कोविडचा परिणाम आहे. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांकडील इथेनॉलची विक्री होईल असे चित्र आहे.

बलवंत पाटील, अंबालिका साखर कारखाना.

----------