शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

तंटामुक्तीतून तांदुळवाडी झाले हरितग्राम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:05 IST

तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़

ठळक मुद्देघरोघरी बहरली आंब्याची झाडे गुणीजनांच्या पाठीवर शाबासकीची थापसाडीचोळी देऊन झाले स्त्री जन्माचे स्वागत

भाऊसाहेब येवलेराहुरी : तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़ पुरस्काराच्या रकमेतून विविध उपक्रम राबविले़ घरासमोर व शेतात लावण्यासाठी एक हजार अांब्याची झाडे लावल्याने आज हे गाव हरितग्राम झाले आहे.आंब्याचं गाव म्हणून या गावची ओळख झाली आहे.तांदुळवाडीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे यांची तर उपाध्यक्षपदी विनीत धसाळ यांची निवड करण्यात आली़ समितीने गावातले तंटे गावातच मिटविण्याचा निर्णय घेतला़ गावकऱ्यांनी साथ दिल्याने तंटे गावातच मिटले़ शासनाने दखल घेऊन तत्कालीन तहसीलदार राजश्री आहिरराव, पोलीस निरीक्षक संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अरूण तनपुरे यांच्या हस्ते गावाला तंटामुक्तीचा सात लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात आला.प्रत्येक कुटुंबाला आंबे चाखायला मिळावे म्हणून एक वर्ष वयाची झाडे तत्कालीन गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकं दे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले़ गावकºयांनी लहान मुलांप्रमाणे आंब्याच्या झाडांचे संगोपन केले़ यंदा आंब्याची झाडे बहरली़ पर्यावरण व आरोग्य यादृष्टीने आंब्याची झाडे पूरक ठरली़ गावाचे सुशोभिकरण व्हावे म्हणून पुरस्काराच्या रकमेतून कमान उभारण्यात आली़ स्त्री जन्माचे स्वागत १०० मातांना साडी चोळी देऊन करण्यात आले़ खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मान केला.गावक-यांना कायमस्वरूपी आठवण राहावी व पर्यावरणाला हातभार लावावा म्हणून गावक-यांना आंब्याची रोपे वाटण्यात आली़ आजही ९० टक्के तंटे हे गावातच मिटतात़ त्यामुळे वेळ व पैशाची बचत होते़ गावक-यांनी साथ दिल्याने विविध उपक्रम राबविणे शक्य झाले.- -विनीत धसाळ, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती.चांगल्या भावनेने आम्हाला आंब्याची रोपे दिली़ आम्ही योग्य पध्दतीने संगोपन केले़ पुढील पिढीला आंब्याची फळे चाखण्यास संधी उपलब्ध झाली़ गावात एकोपा निर्माण झाला. - सविता भांबळ, ज्येष्ठ नागरिक.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी