शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चिंभळे येथे एक ओंजळ पक्ष्यांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हरित परिवार ग्रुपच्या माध्यमातून ‘एक ओंजळ पक्ष्यांसाठी’ हा ...

बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हरित परिवार ग्रुपच्या माध्यमातून ‘एक ओंजळ पक्ष्यांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, अवैध वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दीड वर्षापूर्वी जुलै महिन्यात २०१९ रोजी चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील युवकांनी एकत्र येऊन हरित परिवार ग्रुपच्या माध्यमातून चार एकर पडीक जमिनीत वड, चिंच, जांभूळ, सीताफळ, पेरू, आंबा, उंबर, लिंब अशा ४०० झाडांची लागवड केली. त्याला कूपनलिका व ठिबकद्वारे पाणीपुरवठा करून हिरवीगार वनराई फुलविली. तारेचे कंपाउंड केले. पक्ष्यांनी झाडांवर घरटे बांधले आहेत. हरित परिवार ग्रुपने एकत्र येऊन एक ओंजळ पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

पत्र्याचे पाच डबे घेऊन कमी खर्चात योग्य पद्धतीने कट करून त्यामध्ये पाण्याची सोय करून दररोज बाजरी, तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य झाडावर लटकविले आहेत. धान्याचे दाणे खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी परिसरातील चिमण्या, कावळे, साळुंकी, कबुतर, तितर, कोतवाल, भारद्वाज, कोकीळ आदी पक्षी येत आहेत. पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण वनराईचा परिसर गजबजून गेला आहे.

---

दुष्काळामुळे पाण्याअभावी चिमण्यांचा जीव कासावीस होतो. प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर व झाडांवर पक्ष्यांसाठी थोडे पाणी व धान्य ठेवल्यास ते खरे पुण्य होईल.

-सचिन गायकवाड,

सामाजिक कार्यकर्ते, चिंभळा, ता. श्रीगोंदा