शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम अर्धवट; साईडपट्ट्या खोदल्याने अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:30 IST

कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

मतीन मणियार ।  मढी : पाथर्डी तालुक्यातून जाणारा कल्याण-नांदेड-निर्मळ  महामार्ग (क्र. ६१) खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने अनेक ठिकाणी उकरलेल्या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील तीन वर्षात अपघातांमुळे जवळपास पावणे दोनशे मृत्यू  झाले आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.जमीन हस्तांतर होऊन २०१४ मध्ये कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात अगदी वेगात काम सुरू होते. पाथर्डी तालुक्यात हा महामार्ग करंजी घाट ते खरवंडी कासार असा ५० किलोमीटरचा आहे. १० मीटर रूंदी असणा-या रस्त्याचे काम जून २०१७ पूर्वीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, मागील पाच वर्षे कासवगतीने काम सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे रखडलेले रुंदीकरण काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खोदलेल्या तशाच आहेत. त्या ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी येथे महामार्ग प्रशासन व ठेकेदार संस्था यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. मात्र तरीही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यातही दुजाभाव दिसतो. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे कामही अर्धवट सोडून दिल्याचे दिसते. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, मढीचे बबन मरकड, चक्रधर ससाणे, गणेश कर्डिले, पिंटू परमार, शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप अकोलकर यांनी केली आहे.माझा एकुलता एक मुलगा या रस्त्यावरून रोज नगरला ये-जा करतो. रस्त्याची अवस्था बघता मुलगा सुखरूप घरी येईपर्यंत जीवाला काळजी लागलेली असते, असे करंजी येथील रहिवासी विमल अकोलकर यांनी सांगितले.

या कामाची ठेकेदार कंपनी आर. बी. के. ने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. लवकरच नियुक्त केलेला नवीन ठेकेदार काम सुरू करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :kalyanकल्याणroad safetyरस्ते सुरक्षा