शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

महापालिकेच्या नळातून गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून ...

दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेच्या नळातून केवळ पाच वेळा पाणी आले आहे. हे पाणी दूषित स्वरुपाचे आहे. या दूषित पाण्यामुळे मी स्वत: आजारी पडलो आहे. कमीअधिक स्वरुपात संपूर्ण शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात विविध भागात येणाऱ्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घ्यावेत, अशी मागणी मुळे यांनी केली होती. त्यानंतर मुळे यांनी स्वखर्चाने आगरकरमळा येथील महापालिकेच्या नळातून आलेल्या पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. याचा १४ जुलैला अहवाल प्राप्त झाला असून, पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचे त्यात नमूद आहे. यावरून शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

नगर शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मनपाच्या स्टेशन रोड भागातील नळाच्या पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पदर खर्चाने तपासणीसाठी दिला होता. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा शेरा या अहवालात आला आहे. हे पाणी तपासणीस देण्यापूर्वी मी मनपाला नोटीस दिली होती. दूषित पाण्याबाबत आयुक्तांसह सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील पाणी आणि रस्त्यांची तातडीने सुधारणा करावी, अन्यथा अर्ज, विनंत्या न करता संंबंधितांना थेट व्यक्तिगत प्रतिवादी करून गुन्हे दाखल करून न्यायालयात दाद मागितली जाईल.

- सुहास मुळे, अध्यक्ष जागरूक नागरिक मंच

सोबत :