शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:27 IST

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जनता कर्फ्यू लावण्याआधी दोन दिवस आणि संपल्यानंतर पुढे काही दिवस लोक बाजारात गर्दी करतात. त्यामुळे दहा दिवस केलेल्या कर्फ्यूचा काहीही फायदा होत नाही. दहा दिवसात घरात राहून जे कमवायचे ते एका दिवसात घालवायचे, असे लॉकडाऊनमुळे घडते आहे. त्यामुळे कर्फ्यूचा काहीच उपयोग होत नाही. तरीही स्थानिकांनी कर्फ्यूबाबत निर्णय घेतला तर त्याला सहकार्य केले जाईल. तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी पुढे येऊन एखादे कोविड सेंटर चालू करायचे ठरवले तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, सेवा, जेवण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण पडणार नाही. सरकारी दराच्या पन्नास टक्के दराने त्यांनी उपचार करावेत.

पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरात राहण्याची अद्याप नगर जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईनची सवलत दिलेली आहे. तिथे १२ हजार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. नगर जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चार हजारांच्या आसपास असते. त्यामुळे नगर जिल्ह्यात अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांना घरातच थांबण्याबाबत परवानगी दिलेली नाही. आज जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांना उपचारही मिळत आहेत. त्यामुळे सध्या होम क्वारंटाईनची परवानगी देण्याची गरज नसल्याचे मुश्रिफ म्हणाले.----------मोहिमेत २५ टक्के रुग्ण वाढतील‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. लोकांनी अंगावर दुखणे काढू नये. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्यांना बरे करणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यात साडेसहा हजार बेड तयार ठेवण्यात आले आहेत. २५ आॅक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. घरोघरी आरोग्य दूत म्हणून काम करणाºयांची जबाबदारीशासनानेघेतलीआहे. शासन किती पुरणार, त्यापेक्षा लोकांचीच जबाबदारी वाढली आहे. म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही आता लोकचळवळ बनली पाहिजे. रशियाची लस मिळाली तर लोकांच्या मनातील भीती कमी होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफ