शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:27 IST

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जनता कर्फ्यू लावण्याआधी दोन दिवस आणि संपल्यानंतर पुढे काही दिवस लोक बाजारात गर्दी करतात. त्यामुळे दहा दिवस केलेल्या कर्फ्यूचा काहीही फायदा होत नाही. दहा दिवसात घरात राहून जे कमवायचे ते एका दिवसात घालवायचे, असे लॉकडाऊनमुळे घडते आहे. त्यामुळे कर्फ्यूचा काहीच उपयोग होत नाही. तरीही स्थानिकांनी कर्फ्यूबाबत निर्णय घेतला तर त्याला सहकार्य केले जाईल. तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी पुढे येऊन एखादे कोविड सेंटर चालू करायचे ठरवले तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, सेवा, जेवण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण पडणार नाही. सरकारी दराच्या पन्नास टक्के दराने त्यांनी उपचार करावेत.

पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरात राहण्याची अद्याप नगर जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईनची सवलत दिलेली आहे. तिथे १२ हजार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. नगर जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चार हजारांच्या आसपास असते. त्यामुळे नगर जिल्ह्यात अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांना घरातच थांबण्याबाबत परवानगी दिलेली नाही. आज जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांना उपचारही मिळत आहेत. त्यामुळे सध्या होम क्वारंटाईनची परवानगी देण्याची गरज नसल्याचे मुश्रिफ म्हणाले.----------मोहिमेत २५ टक्के रुग्ण वाढतील‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. लोकांनी अंगावर दुखणे काढू नये. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्यांना बरे करणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यात साडेसहा हजार बेड तयार ठेवण्यात आले आहेत. २५ आॅक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. घरोघरी आरोग्य दूत म्हणून काम करणाºयांची जबाबदारीशासनानेघेतलीआहे. शासन किती पुरणार, त्यापेक्षा लोकांचीच जबाबदारी वाढली आहे. म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही आता लोकचळवळ बनली पाहिजे. रशियाची लस मिळाली तर लोकांच्या मनातील भीती कमी होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफ