शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

नगर पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यास मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST

अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असल्याने येथे पर्यटनदृष्ट्या विकासाला मोठा वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या ...

अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असल्याने येथे पर्यटनदृष्ट्या विकासाला मोठा वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी नगर शहरात आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्काराने जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि. प. सभापती मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनील गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, आर. आर. आबांनी कष्टातून नेतृत्व उभा केले. गावविकासासाठी त्यांची तळमळ असल्याने त्यातून विविध योजना आकाराला आल्या आणि हजारो गावांचा कायापालट झाला. त्यामुळेच त्यांच्या स्मृतीदिनी सुंदर गाव योजनांचे पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामपंचायतींनी आता यावरच न थांबता अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना गावात राबवाव्यात. सर्वांना सोबत घेत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर महात्मा गांधींनी दिलेला खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचा मंत्र प्रत्यक्षात येईल. प्रत्येक गावाने प्राथमिक शाळेसाठी चांगली इमारत, अंगणवाडीसाठी इमारत आणि स्मशानभूमी ही कामे प्राधान्याने करावीत, असे ते म्हणाले. राजश्री घुले यांनी, ग्रामविकास क्षेत्रात गावपातळीवर विविध विकास कामे होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव काळापहाड आणि गौरी जोशी यांनी केले, तर आभार ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी मानले.

----------

या गावांचा गौरव

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रामपंचायत खडांबे खुर्द (ता. राहुरी ) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांना विभागून. सन २०१९-२० मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रा.पं. गणोरे (ता. अकोले) आणि आव्हाणे बु. (ता. शेवगाव) यांना विभागून. सन २०२०-२१ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रा. पं. निमगाव बु. (ता. संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांना विभागून. तसेच सन २०२०-२१ मध्ये तालुकास्तरावर निवड झालेल्या डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बु. (ता. संगमनेर), करंजी (ता. कोपरगाव), श्रीरामपूर- जाफराबाद आणि मुठे वडगाव यांना विभागून. खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी आणि कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर) आणि टाकळी खातगाव (नगर) या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ४० लाख, तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचे पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

----------------

पुन्हा आम्हीच येणार...

‘पुन्हा येईन... पुन्हा येईन’ म्हणणार्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच सत्तेत येणार आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

-------------

फोटो - १६सुंदर गाव पुरस्कार

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी जिल्ह्/ातील २१ गावांना आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.