शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

ग्रासरुट इनोव्हेटर : ...या यंत्रामुळे शेतकऱ्यांना बियाणे कवच फोडणे झाले सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:51 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे कवच फोडण्याचे यंत्र बनविले आहे.

- अनिल लगड (अहमदनगर)

उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजी झाडांना मोठ्या प्रमाणात बिया येतात. या बियांचा औषधांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याला देशभरातून चांगली मागणी असते. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजीच्या बिया गोळा करण्याचे काम सुरू होते. यातून चांगला रोजगारदेखील मिळतो. या बियाणांचे कवच मोठे दणकट असल्याने ते फोडणे मोठे जिकिरीचे काम असते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे कवच फोडण्याचे यंत्र बनविले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कवच फोडणे कठिण असल्याने अनेक जण ते फोडण्याच्या भानगडित न पडता, थेट व्यापाऱ्यांना विक्री करतात. त्यामुळे मजुरांना, महिलांना केवळ रोजंदारीवरच समाधान मानावे लागते. परंतु आता  असे टणक बियाणे फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बाजारात उपलब्ध झाले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही एक यंत्र विकसित केले आहे. हिरडा, रिठा कवच फोडण्यासाठी एक अश्वशक्ती सिंगल फेजवर हे यंत्र चालते. याला विद्यापीठाने विद्युत मोटारचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र असे नाव दिले आहे. हे यंत्र सध्या अतिशय उपयुक्त ठरत आहे. 

या यंत्राचे वैशिष्ट्य असे आहे की, एक अश्वशक्ती सिंगल फेजवर चालते. याला कमी वीज लागते. तसेच कमी श्रमात हे काम करणे सहज होते. या यंत्राची कार्यक्षमता १२५ ते १५० किलोग्रॅम प्रतितास आहे. यामुळे कामही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हे यंत्र चांगलेच फायदेशीर ठरत आहे. या यंत्राची पाहणी करण्याकरिता तसेच माहिती घेण्याकरिता अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, येथे अनेक जण भेटी देत आहेत.