शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

ग्रासरुट इनोव्हेटर : ...या यंत्रामुळे शेतकऱ्यांना बियाणे कवच फोडणे झाले सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:51 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे कवच फोडण्याचे यंत्र बनविले आहे.

- अनिल लगड (अहमदनगर)

उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजी झाडांना मोठ्या प्रमाणात बिया येतात. या बियांचा औषधांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याला देशभरातून चांगली मागणी असते. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजीच्या बिया गोळा करण्याचे काम सुरू होते. यातून चांगला रोजगारदेखील मिळतो. या बियाणांचे कवच मोठे दणकट असल्याने ते फोडणे मोठे जिकिरीचे काम असते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे कवच फोडण्याचे यंत्र बनविले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कवच फोडणे कठिण असल्याने अनेक जण ते फोडण्याच्या भानगडित न पडता, थेट व्यापाऱ्यांना विक्री करतात. त्यामुळे मजुरांना, महिलांना केवळ रोजंदारीवरच समाधान मानावे लागते. परंतु आता  असे टणक बियाणे फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बाजारात उपलब्ध झाले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही एक यंत्र विकसित केले आहे. हिरडा, रिठा कवच फोडण्यासाठी एक अश्वशक्ती सिंगल फेजवर हे यंत्र चालते. याला विद्यापीठाने विद्युत मोटारचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र असे नाव दिले आहे. हे यंत्र सध्या अतिशय उपयुक्त ठरत आहे. 

या यंत्राचे वैशिष्ट्य असे आहे की, एक अश्वशक्ती सिंगल फेजवर चालते. याला कमी वीज लागते. तसेच कमी श्रमात हे काम करणे सहज होते. या यंत्राची कार्यक्षमता १२५ ते १५० किलोग्रॅम प्रतितास आहे. यामुळे कामही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हे यंत्र चांगलेच फायदेशीर ठरत आहे. या यंत्राची पाहणी करण्याकरिता तसेच माहिती घेण्याकरिता अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, येथे अनेक जण भेटी देत आहेत.