शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नातू झाला, तरी महिलांचा सासरी छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

नॅशनल क्राइम रिपोर्टनुसार, विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.४ टक्के इतके ...

नॅशनल क्राइम रिपोर्टनुसार, विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. नगर जिल्ह्यात २०२० या वर्षात कलम ४९८ अंतर्गत (विवाहित स्त्रीशी क्रूरपणा करणे) ३३९ तर मे २०२१ पर्यंत १९३ गुन्हे दाखल आहेत. तक्रार देणाऱ्या महिला या २० ते ५५ या वयोगटांतील आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात महिला हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे. बहुतांशी महिला गेली अनेक वर्षे सासरी पतीसह सासू-सासऱ्यांचा अन्याय सहन करातात. मात्र, त्या तक्रार देत नाहीत.

----------------

मानपानाचं रडगाणं कायम

लग्नात चांगला हुंडा दिला नाही, भांडीकुंडी दिली नाहीत, यासह आम्हाला चांगला मानपान दिला नाही, यासह अगदी क्षुल्लक कारणातून ग्रामीण भागात सासरी पतीसह सासू-सासरे नवविवाहितांचा छळ करतात. बहुतांशी घरात ज्येष्ठ महिलांचाही पतीकडून छळ होतो. काही प्रकरणात मूल होत नसल्याने महिलांना त्रास दिला जात आहे. या त्रासाला कंटळून काही महिला शेवटी मृत्यूला कवटाळतात, तर काही पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करतात.

-----------------------

सासरी महिलांच्या छळाला अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. बहुतांशी वेळ पतीकडून पत्नीला त्रास देण्याचे प्रकार समोर येत असले, तरी घरातील सासू आणि नणंद यांची भूमिकाही महत्त्वाची असते. घरात महिलेने महिलेचा आदर केला, तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. सासूने सुनेला मुलीप्रमाणे तर सुनेने सासूला आईप्रमाणे संभाळावे, ही मानसिकता रुजली, तर घरात होणाऱ्या महिला हिंसाचाराच्या प्रमाणात घट होईल. मुलगा चुकीचा वागत असेल, तर आईने त्याला समजून सांगावे.

ॲड.अनुराधा येवले, सामाजिक कार्यकर्त्या

----------------------

२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -३३९

२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -१९३