शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आजी-आजोबांचे संस्कारच कुटुंब संस्था जिवंत ठेवतील : डॉ़ भाऊसाहेब सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:12 IST

अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ ...

अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ काळाच्या ओघात मात्र एकत्र कुटुंब पद्धतीचे विभक्त कुटुंब पद्धतीत रुपांतर होऊन मानवी आयुष्यातील नैसर्गिक सुख संपत चालले आहे़ याचा संपूर्ण समाजावरच विपरित परिणाम होत आहे़ पूर्वीचे दिवस पुन्हा आणायचे असतील तर कुटुंबातील मुलांवर माता-पिता आणि आजी-आजोबांचे संस्कार व्हावेत, असे मत समाजशास्त्र व मानववंश शास्त्राचे अभ्यासक प्रा़डॉ़ भाऊसाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले़जागतिक कुटुंब दिनानिमित्त मंगळवारी ‘लोकमत’च्यावतीने आयोजित संवादसत्रात सोनवणे बोलत होते़ सोनवणे म्हणाले, पारंपरिक कुटुंब संस्थेने आजपर्यंत वंश आणि संस्कृती टिकवून ठेवली आहे़ या कुटुंबात मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार व्हायचे़ औद्योगिकीकरणामुळे प्रथम एकत्रित कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला़ नोकरीनिमित्ताने स्थलांतर झाले़ यातूनच आपसातील नातेसंबंध आणि जिव्हाळ्याची जागा केवळ अर्थार्जनाने घेतली़आज प्रत्येकाच्या जगण्याची लाईफस्टाईल बदलली आहे़ आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण तरुणी लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत तर ज्यांनी लग्न केले त्यांना पुत्र प्राप्ती नको आहे़ पैसे असूनही माता-पित्यांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे, नवदाम्पत्यांमध्ये वादविवाद वाढले आहेत, आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ न दिल्याने ते वाईट मार्गाला लागले आहेत़ यातून गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे़ असे एक ना अनेक दुष्परिणाम विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समोर आले आहेत. सोनवणे पुढे म्हणाले औद्योगिकीकरण आणि डिजिटल युगातही कुटुंबातील जिव्हाळा पुन्हा निर्माण करणे शक्य आहे़माता-पित्यांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, नवविवाहितांनी नैतिकता, अनैतिकता याचा विचार करून माता-पित्यांचा सन्मान करावा, घरातील ज्येष्ठांचा आदर करावा असे आवाहन त्यांनी केले़तर समाजात वृद्धाश्रम राहणार नाहीवृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही चांगली बाब नाही़ कमवित्या मुलांनी आपली जबाबदारी ओळखून माता-पित्यांचा संभाळ करावा़ सुनेने सासूकडे आई म्हणून पहावे़ धावपळीतही आपले संस्कार आणि कुटुंब जपणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सोनवणे म्हणाले़शिक्षणातून संस्कार शिकवावाघर आणि शाळा, महाविद्यालये ही मुलांवर संस्कार करण्याची मुख्य ठिकाणे आहेत़ आजच्या शिक्षण पद्धतीत संस्काराचा पाठ कुठेच दिसत नाही़ येणाऱ्या काळात तरी शिक्षणातून मुलांवर चांगले संस्कार होऊन ते एक आदर्श नागरिक घडतील अशी शिक्षणपद्धती निर्माण करावी असे मत सोनवणे यांनी व्यक्त केले़(‘लोकमत अहमदनगर’ या फेसबुक पेजवर ही मुलाखत पाहता येईल.)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर