शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आजी-आजोबांचे संस्कारच कुटुंब संस्था जिवंत ठेवतील : डॉ़ भाऊसाहेब सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:12 IST

अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ ...

अहमदनगर : भारतीय समाज व्यवस्थेत कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान आहे़ या संस्थेच्या माध्यमातून एका सुसंस्कृत पिढीच निर्माण होत असते़ काळाच्या ओघात मात्र एकत्र कुटुंब पद्धतीचे विभक्त कुटुंब पद्धतीत रुपांतर होऊन मानवी आयुष्यातील नैसर्गिक सुख संपत चालले आहे़ याचा संपूर्ण समाजावरच विपरित परिणाम होत आहे़ पूर्वीचे दिवस पुन्हा आणायचे असतील तर कुटुंबातील मुलांवर माता-पिता आणि आजी-आजोबांचे संस्कार व्हावेत, असे मत समाजशास्त्र व मानववंश शास्त्राचे अभ्यासक प्रा़डॉ़ भाऊसाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले़जागतिक कुटुंब दिनानिमित्त मंगळवारी ‘लोकमत’च्यावतीने आयोजित संवादसत्रात सोनवणे बोलत होते़ सोनवणे म्हणाले, पारंपरिक कुटुंब संस्थेने आजपर्यंत वंश आणि संस्कृती टिकवून ठेवली आहे़ या कुटुंबात मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार व्हायचे़ औद्योगिकीकरणामुळे प्रथम एकत्रित कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला़ नोकरीनिमित्ताने स्थलांतर झाले़ यातूनच आपसातील नातेसंबंध आणि जिव्हाळ्याची जागा केवळ अर्थार्जनाने घेतली़आज प्रत्येकाच्या जगण्याची लाईफस्टाईल बदलली आहे़ आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण तरुणी लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत तर ज्यांनी लग्न केले त्यांना पुत्र प्राप्ती नको आहे़ पैसे असूनही माता-पित्यांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे, नवदाम्पत्यांमध्ये वादविवाद वाढले आहेत, आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ न दिल्याने ते वाईट मार्गाला लागले आहेत़ यातून गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे़ असे एक ना अनेक दुष्परिणाम विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समोर आले आहेत. सोनवणे पुढे म्हणाले औद्योगिकीकरण आणि डिजिटल युगातही कुटुंबातील जिव्हाळा पुन्हा निर्माण करणे शक्य आहे़माता-पित्यांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, नवविवाहितांनी नैतिकता, अनैतिकता याचा विचार करून माता-पित्यांचा सन्मान करावा, घरातील ज्येष्ठांचा आदर करावा असे आवाहन त्यांनी केले़तर समाजात वृद्धाश्रम राहणार नाहीवृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही चांगली बाब नाही़ कमवित्या मुलांनी आपली जबाबदारी ओळखून माता-पित्यांचा संभाळ करावा़ सुनेने सासूकडे आई म्हणून पहावे़ धावपळीतही आपले संस्कार आणि कुटुंब जपणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सोनवणे म्हणाले़शिक्षणातून संस्कार शिकवावाघर आणि शाळा, महाविद्यालये ही मुलांवर संस्कार करण्याची मुख्य ठिकाणे आहेत़ आजच्या शिक्षण पद्धतीत संस्काराचा पाठ कुठेच दिसत नाही़ येणाऱ्या काळात तरी शिक्षणातून मुलांवर चांगले संस्कार होऊन ते एक आदर्श नागरिक घडतील अशी शिक्षणपद्धती निर्माण करावी असे मत सोनवणे यांनी व्यक्त केले़(‘लोकमत अहमदनगर’ या फेसबुक पेजवर ही मुलाखत पाहता येईल.)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर