शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ग्रामसभांवरुन नगर जिल्ह्यात ग्रामसेवकांची कोंडी; संघटना म्हणते गैरहजर रहा, जिल्हा परिषद सांगते हजर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:18 IST

प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

अहमदनगर : प्रजासत्ताकदिनी गावोगावी बोलविलेल्या ग्रामसभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय ग्रामसेवकांनी गुरुवारी जाहीर केला आहे. त्यामुळे शुक्रवारी राज्यभर होणा-या ग्रामसभांवर आंदोलनाचे सावट असणार आहे. तर जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ग्रामसेवकांचा कंत्राटी सेवाकाळ नियमित करणे,ग्रामसेवकासाठी पदवीधरची अट असावी, नरेगासाठी स्वतंत्र विभाग, ग्रामसभेला पोलीस संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. प्रजासत्ताकदिनी गावातील ध्वजावंदनास उपस्थित राहू़ पण, ग्रामसभेला जाणार नाही, असा इशारा राज्य ग्रामसेवक संघटनेने यापूर्वीच दिलेला आहे. ग्रामसेवकांनी बुधवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत मूक मोर्चा काढला होता. मात्र ग्रामसेवकांच्या मागण्यांची दाखल घेतली गेली नाही. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांनी ग्रामसेवकांना ग्रामसभांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २७ हजार ५३६ ग्रामपंचायती आहेत़ राज्यातील २२ हजार ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे कामकाज पाहतात. परंतु, गावाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ग्रामसभेला ते हजर राहणार नाहीत. त्यामुळे ग्रामसभेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे़ ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ६ नुसार प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा घेण्याचे संकेत आहेत. परंतु, सार्वजनिक सुट्टी असल्याने इतर कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सभेचा मूळ उद्देश साध्य होत नाही. स्थानिक पातळीवर चर्चा करून २७ ते ३० जानेवारी, या काळात ग्रामसभा घेण्याची ग्रामसेवकांची तयारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु, सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी होणा-या सभेला राज्यातील ग्रामसेवक हजर राहणार नाहीत. त्यानंतर ग्रामसभा घेऊन वेळेत अहवाल सादर केला जाईल.-एकनाथ ढाकणे, अध्यक्ष, राज्य ग्रामसेवक युनियन

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर