शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीविरोधात ग्रामसभाच करू शकतात उठाव : ग्रामसभांना ‘लोकमत’चे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:10 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा, भीमा, प्रवरा, गोदावरी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सध्या पाणी नाही. ही संधी साधून अनेक गावांमधून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे.

अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीमुळे मुळा, भीमा, प्रवरा, गोदावरी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सध्या पाणी नाही. ही संधी साधून अनेक गावांमधून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. सर्वच तालुक्यांत हे चित्र असून प्रशासन कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीग्रामसभा घेऊन वाळू तस्करीचा एकजुटीने मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. गावे पेटून उठल्यास वाळू तस्करी थांबविणे शक्य आहे.सध्या अकोले, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड या तालुक्यांत मोठी वाळू तस्करी सुरु आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे नद्या आटून गेल्या आहेत. नदीकाठच्या गावांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नाही. शेतीचीही बिकट अवस्था आहे. नदीकाठच्या विहिरीही आटल्या आहेत. शेतकरी अडचणीत असताना वाळू तस्कर मात्र खुशीत आहेत. शासनाच्या महसुलाचे व जनतेचे नुकसान करत ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. पाऊस पडेपर्यंत उपसा सुरुच राहिल्यास जिल्ह्याचे वाळवंट होण्याचा धोका आहे. त्यामुळे नद्यांचा समतोल बिघडून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आम्ही नदीपात्राकडे निघालो की वाळू तस्करांचे खबरे नदीपात्रात खबर पोहोचवितात. त्यामुळे पथक पोहोचण्याच्या आतच तस्कर गायब होतात, अशी कारणे प्रशासन देत आहे. मात्र, प्रशासन तस्करांबाबत सामूहिकपणे नदीपात्रात उतरताना दिसत नाही. पोलीस, महसूल व आरटीओ प्रशासनात सुसंवाद दिसत नाही. प्रशासनाने एकदिलाने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्यास ते पुन्हा नदिपात्रात येणार नाहीत. पण, तसे घडत नाही.गावाने करावा वाळू तस्करांचा मुकाबलाशासकीय परिपत्रकाप्रमाणे गावांकडेही वाळूचे संरक्षण सोपविण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन गावात वाळू उपसा करु द्यायचा नाही, असा ठराव करु शकते. सर्व गाव सामूहिकपणे नदीपात्रात उतरले व त्यांनी वाळू तस्करांना जाब विचारला तर वाळू तस्कर पळ काढतील. मात्र, गावांची एकजूट होत नाही याचा फायदा वाळू तस्कर घेत आहे. वाळू तस्कर गावात आल्यानंतर गावकरी एकजुटीने रस्ता अडवून पोलीस व महसूल प्रशासनाला बोलवू शकतात. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक या स्थानिक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावकरी वाळूू तस्करी थांबवू शकतात.मात्र, यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावाने एकमुखी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नदीचे चित्रीकरण आवश्यकवाळू उपसा होणारी जी संशयित ठिकाणे आहेत तेथे तहसिलदरांनी व ग्रामपंचायतने चित्रीकरण व छायाचित्रीकरण करुन ठेवणे आवश्यक आहे. या चित्रीकरणात नदिपात्रातील उपलब्ध वाळू दिसेल. पुढे तेथील वाळूसाठा कमी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तलाठी, सर्कल, ग्रामसेवक , ग्रामपंचायत यांना जाब विचारला जाणे आवश्यक आहे. मुख्य चौकात सीसीटीव्हीही लावता येतील.‘लोकमत’ घेणार वाळू तस्करीच्या प्रतिबंधासाठी पुढाकारअवैध वाळू उपसा कसा रोखता येईल? याबाबतचा आराखडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ‘लोकमत’ लवकरच यासंदर्भात अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ व जागरुक नागरिक यांची एकत्रित बैठक घेणार आहे. या बैठकीत प्रशासन व जनता यांच्यात संवाद घडवून आराखडा ठरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ग्रामसभांना ‘लोकमत’चे व्यासपीठवाळू तस्करीला पायबंद घालण्यासाठी नदीकाठच्या गावांनी ग्रामसभा आयोजित केल्यास अशा ग्रामसभांना ‘लोकमत’ व्यापक प्रसिद्धी देऊन या गावांच्या पाठिशी उभा राहणार आहे. वाळूू तस्करी रोखलेल्या काही गावांना ‘लोकमत’ने यापूर्वीच पर्यावरण संवर्धनासाठीचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या गावांची गरज आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर